दुष्काळी परिस्थितीची अधिकार्यांकडून पाहणी नरखेड : शेतकर्यांनी मांडल्या व्यथा
By Admin | Updated: August 23, 2015 20:40 IST2015-08-23T20:40:15+5:302015-08-23T20:40:15+5:30
नरखेड : पावसाळ्याचे दिवस असून सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आह़े जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार शिवारफेरी अभियानांतर्गत मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, भोयरे, नरखेड आदी गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार बी़आऱमाळी आदी अधिकार्यांनी केली़ यावेळी शेतकर्यांनी आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या़

दुष्काळी परिस्थितीची अधिकार्यांकडून पाहणी नरखेड : शेतकर्यांनी मांडल्या व्यथा
न खेड : पावसाळ्याचे दिवस असून सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आह़े जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार शिवारफेरी अभियानांतर्गत मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, भोयरे, नरखेड आदी गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार बी़आऱमाळी आदी अधिकार्यांनी केली़ यावेळी शेतकर्यांनी आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या़साहेब पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले पण अजून पावसाचा पत्ता नाही़ भोगावती व सीना नदी तीन महिन्यांपासून तर भोगावती, नागझरी सहा महिन्यांपासून कोरडी ठणठणीत आह़े पाण्याची पातळी सध्या खाली गेली आह़े बर्याच क्षेत्रावरील ऊस जळून गेला आह़े मागील चार महिन्यांपासून परिसरातील शेतकरी भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आह़े जनावरांसह वाडीवस्त्यावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आह़े या पाहणी दरम्यान जयवंत पाटील, राजाराम साठे, प्रदीप साठे, भारत चव्हाण, सत्यवान कोल्हाळ, विनोद पाटील, दिलीप मोटे, माणिक आवारे, तुकाराम साठे, विजयकुमार पाटील, केराप्पा दाईंगडे, हरिभाऊ खंदारे, नामदेव हजारे, सूर्याजी माळी, राजेंद्र कसबे आदी शेतकरी उपस्थित होत़ेकोट़़़़़़़जनावरांना चारा उपलब्ध करून चारा डेपो सुरू करण्यात येईल़ पाणीटंचाई निर्माण न होण्यासाठी शेततळी, विहीर, पुनर्भरण आदी कामे करण्यात येतील. दुष्काळ परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाला एकजुटीने सहकार्य कराव़े-संजय तेलीप्रांताधिकारी़