शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! देशातील १४ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 10:48 IST

Agriculture Economy: मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Agriculture Economy: मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. हवामान बदलाच्या आव्हानांदरम्यान, नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाचा शेतकऱ्यांना लाभ मिण्याची गरज आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या 94 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यावेळी भर दिला. कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, या क्षेत्राचा अधिक विकास झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

'हवामान बदलासारखी आव्हाने आज आपल्यासमोर आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान करण्याचे आव्हानही आपल्यासमोर आहे. नव्या भारतात नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन सर्व शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जायचे आहे. अधिकृत निवेदनानुसार, त्यांनी कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी ICAR शास्त्रज्ञांच्या योगदानाचे कौतुक केले. तसेच 2047 पर्यंत अधिक संशोधन प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले.

रोकड, डॉलर आणि सोनंनाणं, लालूंच्या कुटुंबीयांवर ईडीने टाकलेल्या धाडीत सापडलं घबाड, आतापर्यंत एवढा ऐवज जप्त

ड्रॅगन फ्रूट, आंबा, भाज्या आणि फुलांसाठी बेंगळुरू, जयपूर आणि गोवा येथे तीन सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले जातील. आतापर्यंत ४९ CoEs मंजूर केले आहेत, त्यापैकी तीन ९ मार्च २०२३ रोजी मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर अंतर्गत मंजूर करण्यात आले आहे, असं कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

कर्नाटकातील बेंगळुरू येथील हिरेहल्ली चाचणी केंद्रात भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थाद्वारे कमलमसाठी एक CoE स्थापित केले जाईल. भारत-इस्रायल कृती आराखड्याअंतर्गत ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात आंबा आणि भाज्यांसाठी दुसरा CoE स्थापन केला जाईल. भाजीपाला आणि फुलांसाठी तिसरा CoE भारत-इस्त्रायल कृती योजनेअंतर्गत दक्षिण गोव्यातील पोंडा येथील सरकारी कृषी फार्ममध्ये स्थापित केला जाईल. याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी