शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi: भारतात परत या, त्याशिवाय पर्याय नाही! पंतप्रधान मोदींचा कर्जबुडव्या उद्योजकांना सज्जड दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 19:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पळालेल्या उद्योगपतींना सज्जड दम भरला आहे.

नवी दिल्ली:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पळालेल्या उद्योगपतींना सज्जड दम भरला आहे. देश सोडून पळालेल्या सर्व पळपुट्या कर्जबुडव्यांना परत आणण्यासाठी सरकार शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब करत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी कोणत्याही उद्योगपतीचं थेट नाव घेणं टाळलं. कर्ज बुडवून परदेशात पळालेल्यांसमोर भारतात परतण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असंही मोदी म्हणाले. ते कर्ज प्रवाह आणि आर्थिक वाढीवर आजोयित एका चर्चेला संबोधित करत होते. 

"पळपुट्या आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्यासाठी आम्ही सर्व कायदेशीरबाबींचा अवलंब करत आहोत आणि लवकरच त्यात यशही येईल. त्यांना माझा एकच आणि स्पष्ट संदेश आहे की भारतात परत या कारण तुम्हाला परत आणण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहणार आहेत. ते काही थांबणार नाहीत", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

विजय मल्ल्या आणि नीरव मोदींना इशारापंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात उद्योगपतींच्या नावाचा थेट उल्लेख केलेला नसला तरी त्यांचा रोख विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यासारख्या पळपुट्या उद्योगपतींकडे होता. आतापर्यंत चुकीचं काम केलेल्यांकडून ५ लाख कोटी रुपयांची वसुली करण्यात आलेली असल्याचीही माहिती त्यांनी दिली. 

बँका अधिक सक्षम होणारकेंद्रात २०१४ साली भाजपाचं सरकार आल्यानंतर बँका अधिक सक्षम झाल्याचा दावा मोदींनी यावेळी केला आहे. "देशाच्या अर्थव्यवस्थाला नवी ऊर्जा देण्यासाठी बँका आता मजबूत स्थितीत काम करत आहेत. यामुळे भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी खूप मदत होणार आहे", असं मोदी म्हणाले. बँकांनी आता स्वत:सोबतच देशाचं ताळेबंद खात्यांची स्थिती सुधारण्यासाठी सक्रियतेनं काम करायला हवं असंही मोदी म्हणाले. 

बँकांना दिला मोलाचा सल्लाबँकांनी आपलं क्षेत्र विस्तार करण्यासाठी आता जुन्हाय संस्कृतीचा त्याग करुन कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठीच्या दृष्टीकोनात सकारात्मक पद्धतीनं विचार करायला हवा. बँकांनी व्यावसायिक जगतासोबतच भागीदारी मॉडेलवरही काम करायला हवं असा सल्ला मोदींनी बँकांना दिला आहे. 

बँकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचावंबँकांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या प्रगतीसाठी आवश्यकतेनुसार ग्राहकांपर्यंत पोहोचायला हवं. ग्राहकांनी बँकेत येण्याची वाट पाहण्यापेक्षा आपण ग्राहकांपर्यंत पोहोचायला हवं, असंही मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBanking Sectorबँकिंग क्षेत्रNirav Modiनीरव मोदीVijay Mallyaविजय मल्ल्या