शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Corona Vacciantion; नरेंद्र मोदींचा निर्णय अशास्त्रीय! एम्सच्या तज्ज्ञाने मुलांच्या लसीकरणावर उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 18:13 IST

एम्सचे ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. संजय के राय यांनी मुलांच्या लसीकरणावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, लहान मुलांमध्ये संसर्गाचा धोका फार कमी आहे, त्यामुळे लसीकरणाचा जास्त फायदा होणार नाही.

नवी दिल्‍ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनाची लस (Corona Vacciantion) देण्याची घोषणा केली. पण, आता एम्सचे वरिष्ठ एपिडेमियोलॉजिस्ट आणि अॅन्टी-कोरोनाव्हायरस लस कोवॅक्सिनच्या प्रौढ आणि मुलांच्या चाचणीचे प्रमुख निरीक्षक डॉ. संजय के राय यांनी केंद्राचा हा निर्णय अवैज्ञानिक असल्याचे म्हटले आहे. डॉ.संजय हे इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.

हा निर्णय लागू करण्यापूर्वी केंद्र सरकारने ज्या देशांनी आपल्या देशात बालकांचे लसीकरण सुरू केले आहे, त्यांच्या आकडेवारीचे विश्लेषण करायला हवे होते, असे मत राय यांनी व्यक्त केले आहे. देशासाठी निःस्वार्थ सेवा केल्याबद्दल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचा खूप मोठा चाहता आहे. पण, मुलांचे लसीकरण करण्याच्या त्यांच्या अवैज्ञानिक निर्णयाने माझी निराशा झाली आहे. संजय राय यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालयालाही (पीएमओ) टॅग केले.

मुलांच्या लसीकरणामुळे नुकसान होणार

ते पुढे म्हणाले की, लहान मुलांमध्ये संसर्गाचा वेग अतिशय कमी आहे. आकडेवारीनुसार, प्रत्येक 10 लाख कोरोनाग्रस्त मुलांमध्ये फक्त दोघांचा मृत्यू होत आहे. ही सर्व आकडेवारी पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की, मुलांना लसीकरणाची गरज वाटत नाही. त्यामुळे लसीकरण केल्यानंतर फायदे कमी आणि तोटे जास्त होऊ शकतात. ज्या कारणामुळे मुलांचे लसीकरण सुरू केले आहे, त्याचा फायदा होणार नाही.

लसीकरणाचा संसर्गावर परिणाम नाहीडॉ.संजय पुढे म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे किंवा रोगाची तीव्रता रोखणे किंवा मृत्यूची प्रकरणे रोखणे हा लसीकरणाचा उद्देश आहे. परंतु या प्राणघातक साथीच्या लसींबद्दल आत्तापर्यंत उपलब्ध असलेली माहिती अशी आहे की, लसींचा विषाणूवर विशेष परिणाम होऊ शकलेला नाही. काही देशांमध्ये अँटी-कोरोनाव्हायरस लसीचा बूस्टर डोस घेतल्यानंतरही लोकांना या विषाणूची लागण झाल्याचे आढळून येत आहे.

तीव्रता कमी करण्यासाठी लस प्रभावी

ते पुढे म्हणाले, यूकेमध्ये दररोज 50 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. यावरून हे सिद्ध होते की लस कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाहीत, परंतु या संसर्गाची तीव्रता आणि मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी आहे. प्रौढ लोकसंख्येमध्ये कोविड मृत्यू दर 1.5 टक्के आहे. याचा अर्थ संसर्गाच्या 10 लाख प्रकरणांमध्ये सुमारे 15 हजार लोकांचा मृत्यू होत आहे. लसीकरणाद्वारे हा आकडा आणखी कमी करता येऊ शकतो, असे ते म्हणाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीAIIMS hospitalएम्स रुग्णालय