शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

२००२ साली झालेलं गोध्रा हत्याकांड आणि गुजरात दंगलीबाबत नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान, म्हणाले, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 22:57 IST

Narendra Modi News: २००२ साली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना झालेले गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर भडकलेल्या गुजरात दंगलींवरही भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रिडमन यांना दिलेली मुलाखत चर्चेत आहे. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, २००२ साली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना झालेले गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर भडकलेल्या गुजरात दंगलींवरही भाष्य केलं आहे. तसेच गोध्रा येथे घडलेली घटना भयंकर होती. तिथे लोकांना जिवंत जाळलं गेलं. त्यानंतर गुजरातमध्ये दंगे भडकले, असं विधान केलं.

२००२ साली गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसच्या एका डब्याला लावलेल्या आगीत ५९ कारसेवकांचा जळून मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये मोठी दंगल भडकली होती. तसेच या दंगलीत हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते. गोध्रा हत्याकांड आणि गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीच्या कटू आठवणींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्ही गुजरात दंगलींसारख्या ज्या मागच्या घटनांचा उल्लेख केला आहे, त्याआधीच्या १२ ते १५ महिन्यांच्या कालावधीत काय काय घडलं याचं चित्र मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो. त्यामधून त्यावेळच्या परिस्थितीचा तुम्हाला अंदाज येईल. उदाहरण घ्यायचं झाल्यास २४ डिसेंबर १९९९ रोजी  काठमांडू येथून दिल्लीला येणाऱ्या भारतीय विमानाचं अपहरण झालं होतं. तसेच अपहरणकर्ते या विमानाला अफगाणिस्तानमधील कंधार येथे घेऊन गेले होते. शकडो भारतीय ओलीस धरले गेले होते. त्यावरून संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण होतं. प्रवाशांच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता.

त्यानंतर २००० साली दिल्लीतील लाल किल्ल्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तर ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवाद्यांनी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त करून हजारो लोकांचा बळी घेतला होता. ऑक्टोबर २००१ मध्ये जम्मू काश्मीरच्या विधानसभेवर तर १३ डिसेंबर २००१ रोजी भारताच्या संसदेवर हल्ला झाला होता. या हल्ल्यांमागे असलेल्या लोकांची मानसिकता एकसारखी होती. ८ ते १० महिन्यांच्या अंतराने ह्या घटना घडल्या होत्या. अशा परिस्थितीत ७ ऑक्टोबर २००१ रोजी मी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं, असंही मोदींनी सांगितलं.

गोध्रा हत्याकांडा आणि गुजरात दंगलीबाबत नरेंद्र मोदी म्हणाले की, २४ फेब्रुवारी २००२ रोजी मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो होतो. जनतेचा प्रतिनिधी बनून  मला तीन दिवस झाले होते. २७ फेब्रुवारी २००२ रोजी आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी गुजरातच्या विधानसभेत बसलो होतो. त्याचवेळी अचानक गोध्रा येथे झालेल्या हत्याकांडाची माहिती समोर आली. ही एक भयंकर घटना होती. लोकांना जिवंत जाळण्यात आलं होतं. कंधार अपहरण, संसदेवर हल्ला, एवढंच नाही तर ९/११ चा हल्ला या घटनांनंतर एवढ्या लोकांना मारणं आणि जिवंत जाळण्याचा प्रकार घडला. त्यावेळी परिस्थिती किती तणावपूर्ण असेल, याची तुम्ही कल्पनाच करू शकता. ही बाब खरोखरच दु:खद होती. प्रत्येकजण शांतता पसंत करतो.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujarat Riots 2002गुजरात दंगल 2002BJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार