शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

२००२ साली झालेलं गोध्रा हत्याकांड आणि गुजरात दंगलीबाबत नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान, म्हणाले, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 22:57 IST

Narendra Modi News: २००२ साली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना झालेले गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर भडकलेल्या गुजरात दंगलींवरही भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रिडमन यांना दिलेली मुलाखत चर्चेत आहे. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, २००२ साली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना झालेले गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर भडकलेल्या गुजरात दंगलींवरही भाष्य केलं आहे. तसेच गोध्रा येथे घडलेली घटना भयंकर होती. तिथे लोकांना जिवंत जाळलं गेलं. त्यानंतर गुजरातमध्ये दंगे भडकले, असं विधान केलं.

२००२ साली गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसच्या एका डब्याला लावलेल्या आगीत ५९ कारसेवकांचा जळून मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये मोठी दंगल भडकली होती. तसेच या दंगलीत हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते. गोध्रा हत्याकांड आणि गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीच्या कटू आठवणींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्ही गुजरात दंगलींसारख्या ज्या मागच्या घटनांचा उल्लेख केला आहे, त्याआधीच्या १२ ते १५ महिन्यांच्या कालावधीत काय काय घडलं याचं चित्र मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो. त्यामधून त्यावेळच्या परिस्थितीचा तुम्हाला अंदाज येईल. उदाहरण घ्यायचं झाल्यास २४ डिसेंबर १९९९ रोजी  काठमांडू येथून दिल्लीला येणाऱ्या भारतीय विमानाचं अपहरण झालं होतं. तसेच अपहरणकर्ते या विमानाला अफगाणिस्तानमधील कंधार येथे घेऊन गेले होते. शकडो भारतीय ओलीस धरले गेले होते. त्यावरून संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण होतं. प्रवाशांच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता.

त्यानंतर २००० साली दिल्लीतील लाल किल्ल्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तर ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवाद्यांनी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त करून हजारो लोकांचा बळी घेतला होता. ऑक्टोबर २००१ मध्ये जम्मू काश्मीरच्या विधानसभेवर तर १३ डिसेंबर २००१ रोजी भारताच्या संसदेवर हल्ला झाला होता. या हल्ल्यांमागे असलेल्या लोकांची मानसिकता एकसारखी होती. ८ ते १० महिन्यांच्या अंतराने ह्या घटना घडल्या होत्या. अशा परिस्थितीत ७ ऑक्टोबर २००१ रोजी मी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं, असंही मोदींनी सांगितलं.

गोध्रा हत्याकांडा आणि गुजरात दंगलीबाबत नरेंद्र मोदी म्हणाले की, २४ फेब्रुवारी २००२ रोजी मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो होतो. जनतेचा प्रतिनिधी बनून  मला तीन दिवस झाले होते. २७ फेब्रुवारी २००२ रोजी आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी गुजरातच्या विधानसभेत बसलो होतो. त्याचवेळी अचानक गोध्रा येथे झालेल्या हत्याकांडाची माहिती समोर आली. ही एक भयंकर घटना होती. लोकांना जिवंत जाळण्यात आलं होतं. कंधार अपहरण, संसदेवर हल्ला, एवढंच नाही तर ९/११ चा हल्ला या घटनांनंतर एवढ्या लोकांना मारणं आणि जिवंत जाळण्याचा प्रकार घडला. त्यावेळी परिस्थिती किती तणावपूर्ण असेल, याची तुम्ही कल्पनाच करू शकता. ही बाब खरोखरच दु:खद होती. प्रत्येकजण शांतता पसंत करतो.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujarat Riots 2002गुजरात दंगल 2002BJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार