शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पत्र लिहिण्यास कारण की...; नरेंद्र मोदींचं इमरान खान यांना उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 12:11 IST

जनतेचा विकास करणे हे भारताचं प्राधान्य आहे. पाकिस्तान वारंवार भारताला चर्चेसाठी आमंत्रित करत आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान आणि परराष्ट्र मंत्री एफ.एम कुरेशी यांच्या अभिनंदन पत्राचं उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इमरान खान यांना पत्र लिहून दहशतवादाच्या मुद्द्याचा उल्लेख केला आहे. दोन्ही देशामध्ये अनुकूल वातावरण बनविण्याचा पुनर्विचार व्हायला हवा. मात्र दहशतवादाचा मार्ग सोडल्यानंतरच हे शक्य आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात लिहिलं आहे. 

नरेंद्र मोदी यांनी इमरान खान यांना पत्र लिहिलं असलं तरी या पत्रात दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशात चर्चा कधी केली जाणार याचा उल्लेख करण्यात आला नाही. पत्रात नमूद केलं आहे की, भारताला आपल्या शेजारील राष्ट्राशी चांगले संबंध बनविण्याची इच्छा आहे. देशाच्या विकासासाठी शांती स्थिरता गरजेची आहे. जनतेचा विकास करणे हे भारताचं प्राधान्य आहे. पाकिस्तान वारंवार भारताला चर्चेसाठी आमंत्रित करत आहे. मात्र जोवर दहशतवादावर पाकिस्तानकडून ठोस कारवाई केली जात नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा करणार नसल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

काही दिवसांपूर्वी बिश्केक येथे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. चीनच्या पुढाकाराने झालेल्या ही बैठक आशियासाठी महत्त्वाची होती. पाकिस्तानलाही तिचे आमंत्रण होते. लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान प्रथमच एकाच व्यासपीठावर आले होते. नेहमीचे नाट्यतंत्र वापरून मोदी इमरान खानबरोबर गळाभेट करतील, अशी अनेकांची अपेक्षा होती. निदान हस्तांदोलन करतील, याची खात्री होती. २०१५मध्ये मोदींनी अचानक लाहोर येथे विमान उतरवून त्या वेळचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली होती. तसेच काही या वेळी होईल, असे वाटत होते; पण ती अपेक्षा पुरी झाली नाही. गळाभेट दूर राहो, मोदींनी इमरान खान यांच्याशी हस्तांदोलनही केले नाही. परिषद समाप्त होत असताना मोदी व इमरान खान एकमेकांशी सौजन्याचे चार शब्द बोलले, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले. भारताने त्याला दुजोरा दिला नाही. 

बिश्केकमध्ये पंतप्रधानांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता, दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत दहशतवादाचा क्रूर चेहरा समोर आला. सर्वच मानवतावादी शक्तींनी या दहशतवादाशी निपटण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या देशांचं फंडिंग बंद केलं पाहिजे, असंही मोदी म्हणाले होते.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान