शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

"५ वर्षात ५ पंतप्रधान, पंतप्रधानांच्या खुर्चीचा लिलाव…", मोदींनी सांगितला इंडिया आघाडीचा फॉर्म्युला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 10:30 IST

Lok Sabha Election 2024 : जर इंडिया आघाडीचे सरकार आले तर पंतप्रधानपदासाठी निवड कशी होईल, याबाबत नरेंद्र मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करत आहेत. मध्य प्रदेशातील बैतुलमध्ये नरेंद्र मोदींनी काँग्रेससह विरोधकांच्या इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी जर इंडिया आघाडीचे सरकार आले तर पंतप्रधानपदासाठी निवड कशी होईल, याबाबत नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच, काँग्रेसने देशातील जनतेची संपत्ती हिसकावण्याची तयारी सुरू केल्याचा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय, कर्नाटकातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही नरेंद्र मोदींनी उपस्थित केला.

नरेंद्र मोदी म्हणाले, "इंडिया आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे की, इंडिया आघाडी एक वर्ष एक पीएम फॉर्म्युला तयार करत आहे, असे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आले आहे. म्हणजे एक वर्ष एक पंतप्रधान, दुसऱ्या वर्षी दुसरा पंतप्रधान, तिसऱ्या वर्षी तिसरा पंतप्रधान चौथ्या वर्षी वर्षाचे चौथा पंतप्रधान आणि पाचव्या वर्षी पाचवा पंतप्रधान. अशा प्रकारे ते पंतप्रधानांच्या खुर्चीचा लिलाव करण्यात व्यस्त आहेत."

काँग्रेसचा धोकादायक छुपा अजेंडा आता उघडपणे समोर आला आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करत आहे. त्यांनी सामाजिक न्यायाची मूलभूत भावनेची हत्या केली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, काँग्रेस पक्ष दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचा द्वेष करतो. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला सर्वात मोठा विरोध बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. काँग्रेस देशाला अधोगतीच्या मार्गावर कशी नेत आहे, हे बाबासाहेबांनी त्यावेळी पाहिले होते, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

कर्नाटकात ओबीसींना आरक्षण मिळते, असे त्यांचे म्हणणे आहे. ओबीसी कोट्यातील आरक्षणाचा वाटा हिसकावून घेण्यासाठी काँग्रेसने राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसी केले. काँग्रेसची ही कृती संपूर्ण देशातील ओबीसी समाजासाठी धोक्याची घंटा आहे. काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात धर्मावर आधारित आरक्षणावर सतत बोलत असते. तेलंगणातील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी मुस्लिमांना आरक्षण मिळेल, असे नाव घेऊन सांगितले, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेसकडून जनतेची संपत्ती हिसकावण्याची तयारी - नरेंद्र  मोदी  याचबरोबर, काँग्रेस आपली व्होट बँक खूश करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. आता काँग्रेसने देशातील जनतेची संपत्ती हिसकावून आपली व्होट बँक मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे. जर कोणाकडे एकापेक्षा जास्त कार, मोटारसायकल, घर असेल, तर त्या काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सरकार जप्त करेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४madhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४