शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सोनियांसाठी सीताराम केसरींना अध्यक्षपदावरून मुदतीपूर्वीच हटविले - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 04:21 IST

सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवायचे असल्यामुळे त्यांच्या आधी या पदावर विराजमान असलेले दलित नेते सीताराम केसरी यांना अध्यक्षपदाची मुदत पूर्ण होण्याआधीच हटविण्यात आले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.

महासमुंद : सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवायचे असल्यामुळे त्यांच्या आधी या पदावर विराजमान असलेले दलित नेते सीताराम केसरी यांना अध्यक्षपदाची मुदत पूर्ण होण्याआधीच हटविण्यात आले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या व अखेरच्या टप्प्यासाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्याआधी घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. गांधी घराण्यातील व्यक्तींऐवजी काँग्रेसमधील एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाध्यक्ष करून दाखवाच असे खुले आव्हान मोदी यांनी दिले होते. त्यावर गांधी घराण्यातील नसलेल्या १५ काँग्रेस अध्यक्षांची नावे नमुद करून माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिले होते.त्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले की, गांधी घराण्यातील चार पिढ्यांनी देशावर सत्ता गाजवली व त्याचे लाभही घेतले. मात्र त्यांच्या राजवटीमुळे देशाचे काहीही कल्याण झाले नाही. याआधी दिल्लीमधील सरकार गांधी घराण्याच्या हाती असलेल्या रिमोट कंट्रोलद्वारे चालविले जायचे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्यातील नव्हे तर त्या पक्षातील सक्षम कार्यकर्त्याला विराजमान करून दाखवाच असे आव्हान मोदींनी दिले.गांधी घराण्याची सत्ता देशात असताना सर्वसामान्य जनतेच्या भवितव्याचा विचार केला जात नव्हता. आपल्याच घराण्याची धन करण्याकडे त्यातील लोकांचे लक्ष होते. त्यामुळे यापुढे ते लोकांच्या आशाआकांक्षा पूर्ण करतील या गोष्टीवर कसा विश्वास ठेवायचा असा सवालही नरेंद्र मोदींनी विचारला. ते म्हणाले की, काँग्रेस केंद्रात सत्तेवर असताना छत्तीसगढचे विद्यमान मुख्यमंत्री रमणसिंह यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काँग्रेसने छत्तीसगढवर नेहमीच अन्याय केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी