शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या रणधुमाळीत 'Mission 100 Days' साठी झटतायेत उच्चपदस्थ सरकारी अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 13:55 IST

१०० दिवसांच्या या प्लॅनिंगमध्ये महिलांच्या नेतृत्वातील विकास, हरित अर्थव्यवस्था, स्टार्टअपसाठी भारत जगासाठी उत्पादन क्षेत्र बनवणे यासारख्या इतर विषयांचाही समावेश आहे

दिल्ली -  देशभरात एकीकडे राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत उच्चपदस्थ सरकारी अधिकारी पुढील सरकारच्या १०० दिवसांच्या योजनांवर काम करण्याची तयारीसाठी घाम गाळत आहेत. PM नरेंद्र मोदी यांनी ३ मार्चला ही जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपवली होती. आचारसंहितेपूर्वी सरकारनं सर्व सचिवांना १० प्रादेशिक विभागांचा भाग बनवलं होते. त्यात ६ सूत्री योजनांवर काम करण्यास सांगितले. मे महिन्याच्या अखेरपर्यंत ब्ल्यू प्रिंटला अंतिम स्वरुप देण्यासाठी कॅबिनेट सचिवांसमोर प्रेझेंटेशन दिले जात आहे. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशीही ही कामे सुरू आहेत.

सूत्रांनी सांगितल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी ३ मार्चला सर्व सचिवांसोबत तब्बल ९ तास दिर्घ बैठक घेतली. या बैठकीत मोदींनी देशात निवडणुका असल्या तरी नियमित कामकाज सुरू राहील. जेव्हा मी जूनमध्ये पुन्हा येईन तेव्हा मला पुढील १०० दिवसांचा आणि ५ वर्षीय योजनांचा आढावा घेईन असं म्हटलं होते.नव्या सरकारच्या १०० दिवसांच्या प्लॅनिंगनुसार, तंत्रज्ञान, डिजिटल सशक्तीकरण, AI चा वापर करून उच्च नागरिक-सक्षम सरकार बनवण्यासाठी काम सुरू आहे. यात ६ सूत्री योजना समोर आल्यात. त्यात मेक्रोइकोनॉमी, सक्षम नागरिक, मजबूत अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण नेतृत्व, प्रभावी शासन, जागतिक पातळीवर भारताला पुढे आणणं यावर चर्चा सुरू आहे.  News 18 नं याबाबत बातमी दिली आहे.

पहिल्या १०० दिवसांमध्ये नागरिकांचे अधिक सक्षमीकरण, संस्था मजबूत करणे, स्पष्टपणे परिभाषित केलेली उद्दिष्टे आणि टार्गेट, डेटा-आधारित प्रशासन आणि नियमांचे पुनरावलोकन यावर लक्ष केंद्रित करणे नव्या सरकारकडून अपेक्षित आहे.पेपर लीकविरोधी कायदा, नागरी सेवांमध्ये नवे अधिकार, ई पासपोर्टसाठी पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ करणे, जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयातील १०० कोटीहून अधिक कागदपत्रांचे डिजिटायलेझशन करणे, ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी ४ हजार कोटी परियोजना मंजूर करणे यासारखे प्रोजेक्ट हाती घेण्यात येणार आहेत. 

दरम्यान, १०० दिवसांच्या या प्लॅनिंगमध्ये महिलांच्या नेतृत्वातील विकास, हरित अर्थव्यवस्था, स्टार्टअपसाठी भारत जगासाठी उत्पादन क्षेत्र बनवणे यासारख्या इतर विषयांचाही समावेश आहे. नुकतेच एका मुलाखतीत मोदींनी म्हटलं होतं की, २०१९ च्या निवडणुकीत मी पुढील १०० दिवसांचं काम देऊन निवडणुकीत उतरलो होतो. त्यानंतर सरकार येताच कलम ३७० हटवण्यात आले. तीन तलाकमधून मुस्लीम भगिनींना मुक्त केले. बँकांचे मर्जर केले असं सांगितले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४