शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

नरेंद्र मोदी की मनमोहन सिंग, ८ वर्षात कुणी निर्माण केले सर्वाधिक केंद्रीय विद्यापीठ? RTI मधून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 15:35 IST

शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला अनेकदा घेरण्यात येतं. विरोधा पक्षानं तर सुरुवातीपासूनच शिक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारवर वारंवार टीका केली आहे.

नवी दिल्ली-

शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला अनेकदा घेरण्यात येतं. विरोधा पक्षानं तर सुरुवातीपासूनच शिक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारवर वारंवार टीका केली आहे. सरकारनंही अनेकदा आकडेवारी सादर करत नव्या शाळा, कॉलेज आणि युनिव्हर्सिटी सुरू केल्याचा दावा केला आहे. केंद्रानं केलेला दावा आणि विरोधकांचे आरोप यातील नेमकं काय खरं जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या एका माहिती अधिकारात महत्वाची माहिती समोर आली आहे. 

इंडिया टूडेनं माहितीच्या अधिकाराअंतर्गत दाखल केलेल्या याचिकेवर सरकारनं सविस्तर माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत ८ वर्षात किती केंद्रीय विद्यापीठ सुरू केले गेले आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ८ वर्षांच्या कार्यकाळात किती विद्यापीठं सुरू करण्यात आली याची माहिती मागविण्यात आली. 

आरटीआयमधून समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ८ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकूण १५९ केंद्रीय विद्यापीठं सुरू केली गेली. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुरुवातीच्या ८ वर्षांच्या कालावधीत एकूण २०२ केंद्रीय विद्यापीठं सुरू केली गेली होती. केंद्रीय विद्यापीठं सब्सिडाइज्ड क्वालिटी एज्युकेशन आणि उत्कृष्ट अकॅडमिक ट्रॅक रिकॉर्डसाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहेत. 

देशात एकूण किती आहेत केंद्रीय विद्यापीठं१ एप्रिल २०२२ पर्यंतच्या आकडेवारीनुसार काठमांडू, मॉक्सो आणि तेहरानमध्ये कार्यरत असलेली तीन विद्यापीठांसह एकूण १२४९ केंद्रीय विद्यापीठं आहेत. एकूण १२४९ केंद्रीय विद्यापीठांमध्ये जवळपास १४,३५,५६२ विद्यार्थी आहेत. 

२०१४-१५ ते २०२१-२२ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यकाळ पाहता १५९ केंद्रीय विद्यापीठांची निर्मिती केली गेली. याचाच अर्थ असा की प्रत्येक वर्षाकाठी सरासरी २० विद्यापीठं सुरू केलीत. यातुलनेत २००४-०५ ते २०११-१२ पर्यंत म्हणजेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुरुवातीच्या ८ वर्षांच्या कार्यकाळात २०२ केंद्रीय विद्यापीठांची सुरुवात झाली. यूपीए सरकारच्या कार्यकाळात दरवर्षी सरासरी २५ केंद्रीय विद्यापीठं सुरू केली गेलीत. 

सध्याच्या एनडीए सरकारमध्ये मध्यप्रदेशात सर्वाधिक २० विद्यापीठं सुरू करण्यात आली. तर उत्तर प्रदेशात १७, राजस्थान १४, कर्नाटकमध्ये १३, छत्तीसगढ आणि ओडिसामध्ये प्रत्येकी १० विद्यापीठं सुरू करण्यात आली आहे. तर यूपीए सरकारच्या सुरुवातीच्या आठ वर्षांच्या काळात ओदिशामध्ये सर्वाधिक २४ विद्यापीठं, मध्य प्रदेशामध्ये २०, बिहारमध्ये १६, यूपीमध्ये १२, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी ११ विद्यापीठ, तर पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी १० विद्यापीठ सुरू करण्यात आली होती. 

अॅडमिशनमध्ये खासदार कोटाही संपुष्टातकेंद्र सरकारनं केंद्रीय विद्यापीठांमध्ये अॅडमिशनसाठी खासदार कोटा संपुष्टात आणला आहे. या कोट्याच्या माध्यमातून केंद्रीय विद्यापीठांमध्ये खासदार १० नावांची शिफारस करू शकत होता. खासदारांना या कोट्यासाठी खूप दबाव सहन करावा लागत होता. मार्च २०२२ मध्ये काँग्रेस खासदार मनिष तिवारी यांनी लोकसभेत १० सीट खूप कमी असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यात सरकारनं हा कोटा एकतर ५० तरी करावी किंवा पूर्णपणे संपुष्टात तरी आणावा अशी मागणी केली होती. यात सरकारनं खासदार कोटा पूर्णपणे बंद करण्याचा पर्याय निवडला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंग