शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

कम्युनिस्टांचा गणतंत्रावर नव्हे, तर 'गनतंत्रा'च्या संस्कृतीवर विश्वास- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 17:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिपुरा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आगरतळातल्या शांती बाजार येथे एक रॅली काढली. या रॅलीदरम्यान मोदींनी कम्युनिस्टांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आगरताळा- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिपुरा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आगरतळातल्या शांतीर बाजार येथे एक रॅली काढली. या रॅलीदरम्यान मोदींनी कम्युनिस्टांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी म्हणाले, न्यू इंडिया आणि न्यू त्रिपुरासाठी काम करणा-या लोकांना मी आवाहन करतो की, या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाला सत्तेवरून पायउतार करा आणि भाजपा विजय मिळवून देत विकासाला चालना द्या. कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते हे अराजकवादी असतात.निवडणुकीदरम्यान ते गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांचा गणतंत्र नव्हे, तर गनतंत्र या संस्कृतीवर विश्वास आहे. केंद्र सरकार गरिबांना घरं बनवण्यासाठी पैसे देते. तसेच वीज पोहोचवण्यासोबतच गॅसची शेकडी घेण्यासाठी पैसेही देतो. परंतु तो पैसा कुठे जातो माहीत नाही. कम्युनिस्ट पक्षाच्या माणसांचं काँग्रेसबरोबर लागेबांधे असल्यानं कोणी आपलं काही वाकडं करू शकत नाही, अशा आविर्भावात असतं. काँग्रेस त्रिपुराच्या निवडणुका का लढवतेय. दिल्लीत मैत्री आणि त्रिपुरात विरोध करण्याचं नाटक कशासाठी ?, सर्व ठिकाणी एकत्र लढतात. मात्र त्रिपुरामध्ये वेगवेगळे का लढतायत ?, हा फक्त मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे वेगळे असल्याचा चुकीचा समज करून घेऊ नका, असंही मोदींनी जनतेला आवाहन केलं आहे.कम्युनिस्टांना या निवडणुकीत मुळासकट उखडून टाका, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कामगार असल्याचा केवळ दिखावा करतात. त्रिपुराच्या मजुरांना अद्याप कामाची किमान मजुरीही मिळत नाही. पण भाजपाचं सरकार सत्तेवर आल्यात पहिलं हेच काम करण्यात येईल. देशात सातवा वेतन आयोग लागू आहे, तर त्रिपुरात चौथा, सरकार कर्मचा-यांना पैसे न मिळाल्यास ते भ्रष्टाचारच करणार ना, आमचं सरकार अस्तित्वात आल्यास आम्ही सातवा वेतन आयोग लागू करू, असं आश्वासनंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी