शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कम्युनिस्टांचा गणतंत्रावर नव्हे, तर 'गनतंत्रा'च्या संस्कृतीवर विश्वास- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 17:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिपुरा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आगरतळातल्या शांती बाजार येथे एक रॅली काढली. या रॅलीदरम्यान मोदींनी कम्युनिस्टांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आगरताळा- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिपुरा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आगरतळातल्या शांतीर बाजार येथे एक रॅली काढली. या रॅलीदरम्यान मोदींनी कम्युनिस्टांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी म्हणाले, न्यू इंडिया आणि न्यू त्रिपुरासाठी काम करणा-या लोकांना मी आवाहन करतो की, या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाला सत्तेवरून पायउतार करा आणि भाजपा विजय मिळवून देत विकासाला चालना द्या. कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते हे अराजकवादी असतात.निवडणुकीदरम्यान ते गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांचा गणतंत्र नव्हे, तर गनतंत्र या संस्कृतीवर विश्वास आहे. केंद्र सरकार गरिबांना घरं बनवण्यासाठी पैसे देते. तसेच वीज पोहोचवण्यासोबतच गॅसची शेकडी घेण्यासाठी पैसेही देतो. परंतु तो पैसा कुठे जातो माहीत नाही. कम्युनिस्ट पक्षाच्या माणसांचं काँग्रेसबरोबर लागेबांधे असल्यानं कोणी आपलं काही वाकडं करू शकत नाही, अशा आविर्भावात असतं. काँग्रेस त्रिपुराच्या निवडणुका का लढवतेय. दिल्लीत मैत्री आणि त्रिपुरात विरोध करण्याचं नाटक कशासाठी ?, सर्व ठिकाणी एकत्र लढतात. मात्र त्रिपुरामध्ये वेगवेगळे का लढतायत ?, हा फक्त मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे वेगळे असल्याचा चुकीचा समज करून घेऊ नका, असंही मोदींनी जनतेला आवाहन केलं आहे.कम्युनिस्टांना या निवडणुकीत मुळासकट उखडून टाका, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कामगार असल्याचा केवळ दिखावा करतात. त्रिपुराच्या मजुरांना अद्याप कामाची किमान मजुरीही मिळत नाही. पण भाजपाचं सरकार सत्तेवर आल्यात पहिलं हेच काम करण्यात येईल. देशात सातवा वेतन आयोग लागू आहे, तर त्रिपुरात चौथा, सरकार कर्मचा-यांना पैसे न मिळाल्यास ते भ्रष्टाचारच करणार ना, आमचं सरकार अस्तित्वात आल्यास आम्ही सातवा वेतन आयोग लागू करू, असं आश्वासनंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी