शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

जनतेने आमच्या कामांची पावती दिली, त्यांची स्वप्ने पूर्ण करणे हेच आमचे ध्येय! पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 05:58 IST

आम्हाला मिळालेला विजय आणि बहुमत हे आम्ही गेल्या पाच वर्षांत जनतेसाठी केलेल्या कामांची पावतीच आहे. देशाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच जनतेने आमच्या हाती पुन्हा सत्ता दिली आहे

नवी दिल्ली : आम्हाला मिळालेला विजय आणि बहुमत हे आम्ही गेल्या पाच वर्षांत जनतेसाठी केलेल्या कामांची पावतीच आहे. देशाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच जनतेने आमच्या हाती पुन्हा सत्ता दिली आहे, असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांनी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी यापुढेही आपण प्रयत्न करीत राहू, असा दावा मंगळवारी लोकसभेत केला.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी महामार्ग, चांद्रयान मोहीम, स्टार्टअप्स आदी विकासाच्या योजनांद्वारे आमच्या सरकारने देशाच्या आधुनिकीकरणाकडे वाटचाल केली आहे, असे सांगून आमची देशातील जनतेशी नाळ जोडली गेलेली आहे. त्यांची स्वप्ने पूर्ण करणे हेच आमचे स्वप्न आहे, असे आम्ही मानतो, असेही प्रतिपादन केले. तसेच मेक इन इंडियाचा उल्लेख करीत, या योजनेची टिंगलटवाळी करणे अयोग्य आहे, असे नमूद केले.यंदा प्रथमच स्थापन केलेल्या जलशक्ती मंत्रालयाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, देशाला जलसंकटातून बाहेर काढण्यासाठी या मंत्रालयातर्फे प्रयत्न केले जातील. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्यामुळे त्याकडे आमचे सरकार विशेष लक्ष देणार आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यावर आम्ही ठाम आहोत आणि येत्या काही वर्षांत आम्ही ते करून दाखवू. मात्र, त्यासाठी पारंपरिक पद्धतीच्या शेतीतून शेतकऱ्यांनाही बाहेर पडायला हवे. त्यासाठीही आम्ही विशेष योजना आणणार आहोत.कोणाचे संख्याबळ किती आहे, हे महत्त्वाचे नसून, सर्वांनीच देशाच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी विरोधकांना, त्यातही विशेषत: काँग्रेस सदस्यांना उद्देशून केले. निवडणुकांतील विजय आणि पराभवाच्या पलीकडे आपण पाहायला हवे आणि देशातील १३0 कोटी जनतेसाठीसकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक भारतीयाला घर आणि प्रत्येक घरात शौचालय या योजनेवर पंतप्रधानांनी भाषणात भर दिला. महिलांना अडचणीच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक घरात शौचालय आवश्यक आहे, असे सांगताना मोदी यांनी ज्येष्ठ समाजवादी नेते दिवंगत डॉ. राम मनोहर लोहिया यांनी याचा उल्लेख केला होता आणि त्यांनी म्हटले होते, ते काम पूर्ण केले जाईल, असा दावा केला.राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रत्येक विधान वा योजनेचा पंतप्रधानांनी भाषणात उल्लेख तर केलाच, पण त्यांनी अनेक वक्त्यांनी अभिभाषणावरील चर्चेत मांडलेल्या मुद्द्यांनाही स्पर्ष केला. आम्ही इतरांनी केलेल्या कामांचे कौतुक निश्चितच करीत आलो आहोत. पण काहींनी फक्त एकाच घराण्यातील नेत्यांचे कौतुक करता येते. अशा मंडळींनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी केलेल्या भरीव कामाचाही कधी उल्लेख केल्याचे आठवत नाही, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.आम्ही कधी बदला घेण्याचे राजकारण केले नाही आणि करणारही नाही, पण आमची भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई कायमच सुरू राहील, असे नमूद करीत पंतप्रधानांनी कोळसा व टू्-जी खटल्यांसंदर्भात केलेल्या उल्लेखांनाही उत्तर दिले.दोन दिवस राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा झाली आणि त्यात ६0 लोकसभा सदस्यांनी भाग घेतला. याचा उल्लेख करतानाच पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील डॉ. अमोल कोल्हे व डॉ. हीना गावीत यांच्या भाषणातील मुद्द्यांचे आवर्जून कौतुक केले. एवढेच नव्हे, तर एमआयएमचे असउद्दिन ओवेसी यांच्या भाषणातील मुद्द्यांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.आम्ही काय आणीबाणी लागू केलेली नाहीकाँग्रेसचे लोकसभेतील नेते आधीर रंजन चौधरी यांनी तुम्ही ज्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना चोर म्हणत होता, त्याचे काय झाले? आमचे हे दोघे नेते या सभागृहात आहेत, असा टोला पंतप्रधानांना लगावला होता. त्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, जे जामिनावर बाहेर आहेत, त्यांनी त्याचा अवश्य आनंद घ्यावा. उठसूट कोणालाही तुरुंगात टाकायला आम्ही देशात आणीबाणी लागू केलेली नाही. देशात स्व. इंदिरा गांधी यांनी २५ जून, १९७५ रोजी आणीबाणी लागू केली होती, त्याचा या विधानाला संदर्भ होता. आणीबाणी हा देश व लोकशाहीवरील काळा डाग होता, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी