शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Narendra Modi: ‘ऑनलाइन पेमेंटमध्ये भारत टॉपवर’, UNच्या कार्यक्रमात PM नरेंद्र मोदींची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 14:10 IST

'भारत हा एक तरुण देश आहे, आमची नेहमी काहीतरी नवीन करण्याची भावना असते. भारत जगातील टॉपचा स्टार्टअप हब आहे.'

हैदराबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज हैदराबाद येथे 'युनायटेड नेशन्स वर्ल्ड जिओस्पेशियल इंटरनॅशनल काँग्रेस'चे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, 'जगात कोणत्याही संकटाच्या वेळी एकमेकांना मदत करण्यासाठी संस्थात्मक दृष्टीकोन आवश्यक आहे. युनायटेड नेशन्ससारख्या जागतिक संस्था प्रत्येक क्षेत्रात शेवटच्या टप्प्यापर्यंत संसाधने नेण्यास सक्षम आहेत. या पाच दिवसीय परिषदेत 115 देशांतील 550 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. हे प्रतिनिधी एकात्मिक भूस्थानिक माहिती व्यवस्थापन आणि त्याच्या क्षमतांच्या विकास आणि बळकटीकरणाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतील.

भारताच्या विकासाचे दोन स्तंभयावेळी बोलताना मोदी म्हणाले, 'भारताच्या विकासात तंत्रज्ञान आणि प्रतिभा, या दोन स्तंभांचा महत्वाचा वाटा आहे. तंत्रज्ञान हा बदलाचा आधार आहे. तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक घटक आहे. डिजिटलायझेशनचा लोकांना कसा फायदा होतो, याचे 'पीएम स्वामीत्व योजना' हे उदाहरण आहे. भारत हे नवीन कलागुण असलेले तरुण राष्ट्र आहे. कोरोना महामारीने आपल्याला शिकवले आहे की, सर्वांना सोबत घेऊन एकत्र आले पाहिजे.' 45 कोटी लोकांना बँकिंग सेवा मिळालीते पुढे म्हणाले की, 'रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या व्यक्तीला सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट साकार करण्यासाठी देश काम करत आहे. देशात 45 कोटी लोकांना बँकिंग सेवा पुरविण्यात आली. ही लोकसंख्या अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. विमा सुविधा नसलेल्या 13.55 दशलक्ष लोकांचा विमा उतरवण्यात आला आणि ही लोकसंख्या फ्रान्सच्या लोकसंख्येइतकी आहे. अकरा कोटी कुटुंबांना स्वच्छता सुविधा आणि 6 कोटींहून अधिक कुटुंबांना नळाचे पाणी देऊन भारत हे सुनिश्चित करत आहे की कोणीही मागे राहणार नाही.'

डिजिटल पेमेंटमध्ये भारत अव्वल ते पुढे म्हणतात की, 'झटपट डिजिटल पेमेंटसाठी भारत जगात अव्वल आहे. अगदी लहान विक्रेतेही डिजिटल पेमेंट स्वीकारतात किंवा पसंत करतात. भारत हा एक तरुण देश आहे, ज्याची काहीतरी नवीन विचार करण्याची भावना आश्चर्यकारक आहे. आम्ही जगातील शीर्ष स्टार्टअप हब आहोत. 2021 पासून देशातील युनिकॉर्न स्टार्ट-अप्सची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. याचे कारण भारतातील तरुण लोकसंख्या आहे,' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीunited nationsसंयुक्त राष्ट्र संघhyderabad-pcहैदराबाद