शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

'काँग्रेस घुसखोरांना वाचवण्यात व्यस्त', बिहारमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 19:28 IST

Narendra Modi in Bihar: 'भारतामध्ये फक्त भारताचेच कायदे चालतील. घुसखोरांना देश सोडावा लागेल.'

Narendra Modi in Bihar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बिहारला 36 हजार कोटी रुपयांची भेट दिली. पूर्णिया विमानतळावरील नव्या टर्मिनलचे उद्घाटन करताना त्यांनी अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजनही केले. या वेळी आयोजित कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी स्पष्ट केले की, 'मागास समाजाला प्राधान्य आणि गरीबांची सेवा हेच माझे ध्येय आहे. देशाच्या विकासासाठी बिहारचा विकास अत्यावश्यक आहे.'

गरीबांसाठी पक्की घरे

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'मागील 11 वर्षांत केंद्र सरकारने 4 कोटींहून अधिक पक्की घरे गरिबांना दिली आहेत. आता आणखी 3 कोटी घरे उभारण्याचे काम सुरू आहे. जोपर्यंत प्रत्येक गरीबाला पक्के घर मिळत नाही, तोपर्यंत मोदी थांबणार नाही,' असे ते म्हणाले.

काँग्रेस आणि राजदवर टीका

मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि राजदवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आरोप केला की, 'काँग्रेस घुसखोरांना वाचवण्यात व्यस्त आहे, तर एनडीए सरकारने त्यावर बंदी घालण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. भारतामध्ये फक्त भारताचेच कायदे चालतील. जे घुसखोर आहेत त्यांना देश सोडावा लागेल. बिहारच्या लोकांना आता अपराधमुक्त राज्य हवे आहे. त्यामुळेच ते विरोधकांना योग्य उत्तर देतील. बिहारच्या जनतेला राजदचा जंगलराज माहिती आहे, त्यामुळे जनता एनडीएसोबत ठाम आहे,' असे मोदी म्हणाले.

सीमांचल व पूर्णियाच्या विकासावर भर

पंतप्रधान पुढे म्हणाले की, 'देशाच्या विकासासाठी बिहारचा विकास आवश्यक आहे आणि बिहारच्या विकासासाठी पूर्णिया व सीमांचलचा विकास महत्त्वाचा आहे. काँग्रेस आणि राजदच्या कुशासनामुळे या भागाला मोठे नुकसान सहन करावे लागले, परंतु आता एनडीए सरकारने परिस्थिती बदलली असून हा प्रदेश विकासाच्या मुख्य प्रवाहात आणला जात आहे.' 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारcongressकाँग्रेस