शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

Narendra Modi: कोरोना निर्बंध उठताच रोजगार दुप्पटीने वाढला, वर्षात 1 कोटी 20 लाख नवे जॉब्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 12:30 IST

ईपीएफओवरुन देशातील रोजगार निर्मित्तीची एकदम योग्य आणि विश्वासार्ह माहिती मिळते. त्यानुसार देशात 2021 मध्ये जवळपास 1 कोटी 20 लाख नवीन रोजगार निर्माण झाले आहेत.

नवी दिल्ली  - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना देशातील कोरोना परिस्थितीवर केंद्र सरकारने केलेल्या कार्याची माहिती दिली. लोकसभेत बोलताना मोदींनी केंद्र सरकारने गरिब कल्याण योजनेंतर्गत देशातील गरीबांना मोफत धान्यवाटप केल्याचं सांगितलं. कोरोनावर मात करण्यात आपण यशस्वी ठरलो, त्यानंतर आता रोजगारनिर्मित्तही वाढ झाल्याचे मोदींनी सांगितले. राज्यसभेत बोलताना मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

ईपीएफओवरुन देशातील रोजगार निर्मित्तीची एकदम योग्य आणि विश्वासार्ह माहिती मिळते. त्यानुसार देशात 2021 मध्ये जवळपास 1 कोटी 20 लाख नवीन रोजगार निर्माण झाले आहेत. हे सर्व फॉर्मल जॉब्स आहेत, इनफॉर्मल नाहीत. त्यामध्ये 60 ते 65 लाख नोकरदार हे 18 ते 25 वर्षे वयाची तरुणपिढी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना सांगितले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदींनी कोविड आणि कोविडनंतरच्या देशातील स्थितीचं वर्णन केलं. तसेच, कोरोनानंतर रोजगारनिर्मित्तीत वाढ झाल्याचंही सांगितलं.  

नेसकॉमच्या अहवालानुसार कोरोनाच्या पहिल्या तुलनेत कोविड निर्बंध उठवल्यानंतर दुप्पटीनं नोकर भरती होत आहे. नेसकॉमच्या डेटानुसार 2017 नंतर गेल्या वर्षभरात 27 लाख जॉब्स आयटी सेक्टरमध्ये उपलब्ध झाले आहेत. आयटी सेक्टरमध्ये काम करणारे हा वरिष्ठ स्तरावरील वर्ग असतो. म्हणजे, देशातून ग्लोबल एक्सपोर्ट वाढला असून रोजगार निर्माण झाल्याचे मोदींनी सांगितले. एमएसएमई सेक्टरच्या माध्यमातून उत्पादन क्षेत्रात वाढ झाली असून नवीन रोजगार निर्मित्ती झाली आहे. सन 2021 मध्ये केवळ एका वर्षात भारताने जेवढे युनिकॉर्न बनवले आहेत, ते देशाच्या इतिहासातील सर्वात जास्त आहेत. जर हे रोजगारनिर्मित्तीत येत नसेल, तर रोजगारापेक्षा राजकारणाची सर्वाधिक तुलना होईल, असेही मोदींनी राज्यसभेत बोलताना म्हटले.

मोबाईल उत्पादनात भारताचा पहिला नंबर  

मोबाईल उत्पादनात भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. ऑटोमोबाईल, बॅटरी निर्मितीत आपला समावेश अग्रगण्य देशांच्या यादीत होतो. इंजिनीयरिंग उत्पादनांची निर्यात वाढली आहे. हे आपल्या देशाचं कौशल्य आहे. संकटाला आपण धीरानं सामोरे गेलो. त्याचं श्रेय देशवासीयांना जातं. आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी केलेलं काम तर अतिशय कौतुकास्पद आहे. मी त्यांचे आभार मानतो, असं मोदींनी म्हटलं.

80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं

कोरोना काळात कोणकोणती कामं झाली त्याची यादी मोठी आहे. लॉकडाऊन काळात कोणी उपाशी राहू नये यासाठी ८० कोटी लोकांना मोफत रेशन दिलं. लाखो लोकांना घरं दिली. घरासाठी येणारा खर्च पाहता आता या व्यक्ती लखपती झाल्या असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. ५ कोटी ग्रामीण कुटुंबाना नळातून पाणी पुरवलं. कोरोना काळात ग्रामीण भागाला लॉकडाऊनपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा परिणाम दिसला. शेतकऱ्यांनी बंपर उत्पादन घेतलं आणि अर्थव्यवस्थेला हात दिला, असं म्हणत मोदींनी शेतकऱ्यांचे आभार मान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारीUnemploymentबेरोजगारी