शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेसच्या दहा वर्षात फक्त घोटाळे झाले; देशाची जगभरात बदनामी झाली', PM मोदींनी तोफ डागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 17:03 IST

'काँग्रेसच्या दहा वर्षांच्या काळात काश्मीरपासून कन्याकूमारीपर्यंत दहशतीचे वातावरण होते, संपूर्ण देशात हिंसाचार पसरला होता.'

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या काळात झालेल्या आरोपांचा पाढाच वाचला. तसेच, काँग्रेसच्या काळात देशात दहशतवाद आणि हिंसाचार वाढल्याा आरोपही केला. 

यावेळी मोदी म्हणाले की, '2004 ते 2014 या काँग्रेसच्या दहा वर्षांच्या काळात काश्मीरपासून कन्याकूमारीपर्यंत दहशतीचे वातावरण होते. संपूर्ण देशात हिंसाचार पसरला होता. त्या दहा वर्षात भारताचा आवाज ऐकायलाही कुणी तयार नव्हतं. पण, त्यानंतर 2014 पासून देशाचे सामर्थ्य वाढले आणि जगभरात देशाचे नाव उंचावले. विरोधकांच्या निराशेचे कारण म्हणजे, देशाची क्षमता वाढत आहे, देशाचे सामर्थ्य वाढ आहे. 2004 पासून 14 पर्यंत यांना मोठी संधी होती, पण यूपीए सरकारने सर्व संधी वाया घालवली. देशावर इतके दहशतवादी हल्ले झाले, पण सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. दहा वर्षे हजारो भारतीयांचे रक्त वाहत होते. LOC-LAC वर सुरक्षा वाढवण्याची गरज होती, पण हे सरकार घोटाळ्यात व्यस्त होते.

मोदी पुढे म्हणाले, 'ज्या काळात तंत्रज्ञान क्षेत्रात वाढ होत होती, तेव्हा हे 2जी घोटाळ्यात अडकले. सिव्हिल न्युक्लीअर करार झाला, तेव्हा हे कॅश फॉर व्होटमध्ये अडकले होते. यांनी हेच खेळ सुरू ठेवले आणि देशाला अंधारात टाकले. 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स झाले, देशातील खेळाडूंना मोठी संधी होती. पण, हे लोक सीडब्लूजी घोटाळ्यात अडकले आणि देश बदनाम झाला. उर्जेचा कोणत्याही देशाच्या विकासात खूप महत्व आहे. जेव्हा भारताला उर्जेच्या क्षेत्रात पुढे जाण्याची गरज होती, त्या काळात देशभरात ब्लॅक आउटची चर्चा व्हायची. यांचा कोळसा घोटाळाही चर्चेत आला,' अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा