शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

'काँग्रेसच्या दहा वर्षात फक्त घोटाळे झाले; देशाची जगभरात बदनामी झाली', PM मोदींनी तोफ डागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 17:03 IST

'काँग्रेसच्या दहा वर्षांच्या काळात काश्मीरपासून कन्याकूमारीपर्यंत दहशतीचे वातावरण होते, संपूर्ण देशात हिंसाचार पसरला होता.'

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या काळात झालेल्या आरोपांचा पाढाच वाचला. तसेच, काँग्रेसच्या काळात देशात दहशतवाद आणि हिंसाचार वाढल्याा आरोपही केला. 

यावेळी मोदी म्हणाले की, '2004 ते 2014 या काँग्रेसच्या दहा वर्षांच्या काळात काश्मीरपासून कन्याकूमारीपर्यंत दहशतीचे वातावरण होते. संपूर्ण देशात हिंसाचार पसरला होता. त्या दहा वर्षात भारताचा आवाज ऐकायलाही कुणी तयार नव्हतं. पण, त्यानंतर 2014 पासून देशाचे सामर्थ्य वाढले आणि जगभरात देशाचे नाव उंचावले. विरोधकांच्या निराशेचे कारण म्हणजे, देशाची क्षमता वाढत आहे, देशाचे सामर्थ्य वाढ आहे. 2004 पासून 14 पर्यंत यांना मोठी संधी होती, पण यूपीए सरकारने सर्व संधी वाया घालवली. देशावर इतके दहशतवादी हल्ले झाले, पण सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. दहा वर्षे हजारो भारतीयांचे रक्त वाहत होते. LOC-LAC वर सुरक्षा वाढवण्याची गरज होती, पण हे सरकार घोटाळ्यात व्यस्त होते.

मोदी पुढे म्हणाले, 'ज्या काळात तंत्रज्ञान क्षेत्रात वाढ होत होती, तेव्हा हे 2जी घोटाळ्यात अडकले. सिव्हिल न्युक्लीअर करार झाला, तेव्हा हे कॅश फॉर व्होटमध्ये अडकले होते. यांनी हेच खेळ सुरू ठेवले आणि देशाला अंधारात टाकले. 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स झाले, देशातील खेळाडूंना मोठी संधी होती. पण, हे लोक सीडब्लूजी घोटाळ्यात अडकले आणि देश बदनाम झाला. उर्जेचा कोणत्याही देशाच्या विकासात खूप महत्व आहे. जेव्हा भारताला उर्जेच्या क्षेत्रात पुढे जाण्याची गरज होती, त्या काळात देशभरात ब्लॅक आउटची चर्चा व्हायची. यांचा कोळसा घोटाळाही चर्चेत आला,' अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा