शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

'काँग्रेसच्या दहा वर्षात फक्त घोटाळे झाले; देशाची जगभरात बदनामी झाली', PM मोदींनी तोफ डागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 17:03 IST

'काँग्रेसच्या दहा वर्षांच्या काळात काश्मीरपासून कन्याकूमारीपर्यंत दहशतीचे वातावरण होते, संपूर्ण देशात हिंसाचार पसरला होता.'

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या काळात झालेल्या आरोपांचा पाढाच वाचला. तसेच, काँग्रेसच्या काळात देशात दहशतवाद आणि हिंसाचार वाढल्याा आरोपही केला. 

यावेळी मोदी म्हणाले की, '2004 ते 2014 या काँग्रेसच्या दहा वर्षांच्या काळात काश्मीरपासून कन्याकूमारीपर्यंत दहशतीचे वातावरण होते. संपूर्ण देशात हिंसाचार पसरला होता. त्या दहा वर्षात भारताचा आवाज ऐकायलाही कुणी तयार नव्हतं. पण, त्यानंतर 2014 पासून देशाचे सामर्थ्य वाढले आणि जगभरात देशाचे नाव उंचावले. विरोधकांच्या निराशेचे कारण म्हणजे, देशाची क्षमता वाढत आहे, देशाचे सामर्थ्य वाढ आहे. 2004 पासून 14 पर्यंत यांना मोठी संधी होती, पण यूपीए सरकारने सर्व संधी वाया घालवली. देशावर इतके दहशतवादी हल्ले झाले, पण सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. दहा वर्षे हजारो भारतीयांचे रक्त वाहत होते. LOC-LAC वर सुरक्षा वाढवण्याची गरज होती, पण हे सरकार घोटाळ्यात व्यस्त होते.

मोदी पुढे म्हणाले, 'ज्या काळात तंत्रज्ञान क्षेत्रात वाढ होत होती, तेव्हा हे 2जी घोटाळ्यात अडकले. सिव्हिल न्युक्लीअर करार झाला, तेव्हा हे कॅश फॉर व्होटमध्ये अडकले होते. यांनी हेच खेळ सुरू ठेवले आणि देशाला अंधारात टाकले. 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स झाले, देशातील खेळाडूंना मोठी संधी होती. पण, हे लोक सीडब्लूजी घोटाळ्यात अडकले आणि देश बदनाम झाला. उर्जेचा कोणत्याही देशाच्या विकासात खूप महत्व आहे. जेव्हा भारताला उर्जेच्या क्षेत्रात पुढे जाण्याची गरज होती, त्या काळात देशभरात ब्लॅक आउटची चर्चा व्हायची. यांचा कोळसा घोटाळाही चर्चेत आला,' अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा