शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Coronavirus...तुम्हीच सणासारखे वातावरण निर्माण केले; संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 11:43 IST

लॉकडाउन संपल्यानंतर लगेचच मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या शहरांमध्ये लोक घराबाहेर पडले असून मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसने देशामध्ये आणीबाणीची स्थिती आणली असून आकडा रुग्णांचा दिवसेंदिवस कमालीचा वाढत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यू लागू करत देशवासियांना घरातच राहण्याचे आवाहन केले होते. तसेच सायंकाळी पाच वाजता कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलिसांचे आभार मानण्यासाठी टाळ्या, घंटानाद आणि थाळी वाजविण्याचेही आवाहन केले होते. अखेर आज मोदी यांनी पुन्हा लोकांवर नाराजी व्यक्त केली आहे. 

लॉकडाउन संपल्यानंतर लगेचच मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या शहरांमध्ये लोक घराबाहेर पडले असून मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. रविवारी लोकांनी अभूतपूर्व असा बंद पाळला होता. पण सायंकाळी ५ वाजता कोणतातरी उत्सव साजरा करण्यासाठी जमतात तसे जमून सोसायट्या, रस्त्यांवर येत आनंदोत्सव साजरा केला. यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा रस्ते गजबजलेले दिसून आले. 

यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त करत लॉकडाऊनला लोक गंभीरतेने घेत नाहीयेत. कृपा करून स्वत:ला वाचवावे, आपल्या कुटुंबीयांना वाचवावे. सरकारच्या सूचनांचे नीट पालन करावे. राज्य सरकारांना माझी विनंती आहे की, लोकांकडून नियम आणि कायद्यांचे पालन करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. 

यावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना कोपरखळी हाणली आहे.  आपल्या पंतप्रधानांना चिंता लागून राहिली आहे की लॉकडाऊनला लोक गंभीरतेने घेत नाहीयेत. प्रिय पतप्रधानजी तुम्ही भीती आणि चिंतेच्या वातावरणातही सणासारखे वातावरण तयार केलात तर असेच होणार. सरकार गंभीर असेल तरच जनताही गंभीर होईल, अशी टीका केली आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाShiv Senaशिवसेना