शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

PM मोदी यांनी चार प्रमुख मंत्रालयांच्या मंत्र्यांमध्ये का केला नाही बदल, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 14:38 IST

Narendra Modi Cabinet: रविवारी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी झाल्यानंतर सोमवारी मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील सहकारी मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले आहे. मात्र या खातेवाटपामध्ये भाजपाने संरक्षण, गृह, वित्त आणि परराष्ट्र ही चार प्रमुख मंत्रालये आपल्या ताब्यात ठेवली आहेत.

रविवारी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी झाल्यानंतर सोमवारी मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील सहकारी मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले आहे. मात्र या खातेवाटपामध्ये भाजपाने संरक्षण, गृह, वित्त आणि परराष्ट्र ही चार प्रमुख मंत्रालये आपल्या ताब्यात ठेवली आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांनी या चारही मंत्रालयांचा कार्यभार हा दुसऱ्या कार्यकाळात ही खाती सांभाळत असलेल्या मंत्र्यांकडेच कायम ठेवला आहे. त्यामध्ये राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण, अमित शाहा यांच्याकडे गृह, निर्मला सीतारमन यांच्याकडे वित्त आणि एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार कायम ठेवला आहे. आता या चार प्रमुख मंत्रालयांचा कार्यभार त्याच नेत्यांकडे कायम ठेवण्यामागची कारणं आहेत. तसेच त्याचा सरकारलाही विशेष फायदा होणार आहे. 

केंद्र सरकारमध्ये एकूण ८ प्रमुख कॅबिनेट समित्या असतात. त्यामधे संरक्षण समिती ही सर्वात महत्त्वाची असते. त्यामध्ये गृह, संरक्षण, वित्त आणि परराष्ट्र मंत्र्यांचा समावेश असतो. आया या चारही मंत्रालयांमध्ये कुठलाही बदल न करता नरेंद्र मोदी यांनी सरकारची आधीचीच धोरणं पुढे नेली जातील, असा स्पष्ट संदेश दिला आहे. सध्या आघाडी सरकार असले तरी सरकारच्या धोरणांमध्ये फारसा बदल केला जाणार नाही. तसेच पहिल्या दोन कार्यकाळांप्रमाणेच झटपट निर्णय घेतले जातील, असे संकेत मोदींनी आपल्या चार विश्वासू सहकाऱ्यांकडे ही चार प्रमुख मंत्रालयं सोपवून दिला आहे. सीसीएस म्हणजेच कॅबिनेट संरक्षण समितीमधील चारही नेते हे भाजपाचे असल्याने राष्ट्रीय सुरक्षएबाबत एक धोरण ठरवण्यात आणि आणीबाणीच्या स्थितीत तातडीने निर्णय घेणं सोपं होणार आहे.  

दरम्यान, भाजपाचा बहुतांश मतदार हा राष्ट्रीय सुरक्षेबाबत कमालीचा संवेदनशील आहे. त्यामुळे या मंत्रालयांना आपल्या ताब्यात ठेवत भाजपाकडून एक सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार