शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, चोख बंदोबस्त
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
4
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
5
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
6
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
7
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
8
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
9
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
10
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
11
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
12
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
13
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
14
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
15
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
16
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
17
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
18
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
20
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

PM मोदी यांनी चार प्रमुख मंत्रालयांच्या मंत्र्यांमध्ये का केला नाही बदल, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 14:38 IST

Narendra Modi Cabinet: रविवारी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी झाल्यानंतर सोमवारी मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील सहकारी मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले आहे. मात्र या खातेवाटपामध्ये भाजपाने संरक्षण, गृह, वित्त आणि परराष्ट्र ही चार प्रमुख मंत्रालये आपल्या ताब्यात ठेवली आहेत.

रविवारी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी झाल्यानंतर सोमवारी मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील सहकारी मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले आहे. मात्र या खातेवाटपामध्ये भाजपाने संरक्षण, गृह, वित्त आणि परराष्ट्र ही चार प्रमुख मंत्रालये आपल्या ताब्यात ठेवली आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांनी या चारही मंत्रालयांचा कार्यभार हा दुसऱ्या कार्यकाळात ही खाती सांभाळत असलेल्या मंत्र्यांकडेच कायम ठेवला आहे. त्यामध्ये राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण, अमित शाहा यांच्याकडे गृह, निर्मला सीतारमन यांच्याकडे वित्त आणि एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार कायम ठेवला आहे. आता या चार प्रमुख मंत्रालयांचा कार्यभार त्याच नेत्यांकडे कायम ठेवण्यामागची कारणं आहेत. तसेच त्याचा सरकारलाही विशेष फायदा होणार आहे. 

केंद्र सरकारमध्ये एकूण ८ प्रमुख कॅबिनेट समित्या असतात. त्यामधे संरक्षण समिती ही सर्वात महत्त्वाची असते. त्यामध्ये गृह, संरक्षण, वित्त आणि परराष्ट्र मंत्र्यांचा समावेश असतो. आया या चारही मंत्रालयांमध्ये कुठलाही बदल न करता नरेंद्र मोदी यांनी सरकारची आधीचीच धोरणं पुढे नेली जातील, असा स्पष्ट संदेश दिला आहे. सध्या आघाडी सरकार असले तरी सरकारच्या धोरणांमध्ये फारसा बदल केला जाणार नाही. तसेच पहिल्या दोन कार्यकाळांप्रमाणेच झटपट निर्णय घेतले जातील, असे संकेत मोदींनी आपल्या चार विश्वासू सहकाऱ्यांकडे ही चार प्रमुख मंत्रालयं सोपवून दिला आहे. सीसीएस म्हणजेच कॅबिनेट संरक्षण समितीमधील चारही नेते हे भाजपाचे असल्याने राष्ट्रीय सुरक्षएबाबत एक धोरण ठरवण्यात आणि आणीबाणीच्या स्थितीत तातडीने निर्णय घेणं सोपं होणार आहे.  

दरम्यान, भाजपाचा बहुतांश मतदार हा राष्ट्रीय सुरक्षेबाबत कमालीचा संवेदनशील आहे. त्यामुळे या मंत्रालयांना आपल्या ताब्यात ठेवत भाजपाकडून एक सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार