शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींचा फायदा भाजपाला होतो, देशाला नाही; संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 11:41 IST

देशातील लोकशाही संपतेय म्हणून टीका करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांची संसदेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी देशाच्या इतिहासात कधी घडली नव्हती असं त्यांनी म्हटलं. 

नवी दिल्ली - हा देश फक्त भाजपाच्या फायद्यासाठी चालू आहे. सत्ता आणि निवडणुका यापलीकडे भाजपा जात नाही. मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणुका का रखडवल्या आहेत? सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे भाजपाचे एकमेव धोरण आहे. त्यासाठी अदानी, मेहूल चौकसी, नीरव मोदी यांना पाठिशी घालायचं. या धोरणाने त्यांचे राज्य चालले असेल तर निवडणूक आणि सत्ता याशिवाय त्यांच्या डोक्यात अन्य काही असेल असं वाटत नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, देशात अनेक प्रकार यापूर्वी कधीच घडले नाहीत. नरेंद्र मोदींचा फायदा भाजपाला होतोय, देशाला नाही. दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक होऊ देत नव्हते. दिल्लीतील सरकार लोकांनी निवडलेले आहे. आज अर्थसंकल्प होऊ दिला जात नाही. देशात अनेक गोष्टी घडतायेत त्या इतिहासात कधी घडल्या नाही. एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी भाजपा कामाला लागलीय. बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना एका फुटीर गटाच्या हाती देण्याचा मोठा सौदा भाजपाने केला. निवडणूक आयोगाचा वापर केला जातो. देशातील लोकशाही संपतेय म्हणून टीका करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांची संसदेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी देशाच्या इतिहासात कधी घडली नव्हती असं त्यांनी म्हटलं. 

चुंबन प्रकरणात SIT अन्...फोटो ट्विट केला, ज्या मुलीवर कोयत्याने वार झालेत. तिचे पालक माझ्याशी बोलले, जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही तर मला इच्छा मरणाची मागणी द्या असा आक्रोश आईने केलाय. बार्शीतल्या काही गुंडांनी तिच्यावर निर्घृण हल्ला केला. जर मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहचवायचा असेल तर मी ते ट्विटरचं माध्यम वापरलं. जर माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल तर राज्यातील कायदा कुठल्याप्रकारे चालतोय ते दिसून येते. चुंबन प्रकरणात SIT स्थापन होते आणि मी एका रक्तबंबाळ मुलीचा फोटो टाकून तिला न्याय मागितला म्हणून माझ्यावर गुन्हा नोंदवला जातो याचा अर्थ राज्यातील कायदा सुव्यवस्था काही लोकांच्या कोठीवर कशी नाचतेय हे स्पष्ट होते अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. 

ज्यांनी तक्रार केली तेच न्यायाधीशांच्या भूमिकेतविधानसभेच्या हक्कभंग समितीत ज्यांनी माझ्याविरोधात तक्रार केली तेच न्यायाच्या भूमिकेत आहेत. ज्यांच्याविरोधात मी ५०० कोटी मनी लॉन्ड्रिंगचा जे आरोप, पुरावे दिले ते हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत. हे सगळे ठरवून झालेय त्यामुळे इथं न्याय म्हणण्याची शक्यता कमी आहे. मी संपूर्ण विधिमंडळाला चोरमंडळ म्हटलं नाही. जे शिवसेनेतून फुटून गेले. त्यांच्याविरोधात माझे विधान आहे. हे चोरमंडळ विधिमंडळ असू शकत नाही असं मी म्हटलं आहे असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले. राहुल कूल, दादा भूसे यांच्याविरोधात मी मुख्यमंत्र्यांकडे पुरावे दिले आहेत. परंतु त्यांच्याकडे ढुंकणही पाहिले जात नाही. मात्र विरोधकांना जाणीवपूर्वक गोवण्याचं काम केले जाते असा आरोप राऊतांनी केला. 

उद्धव ठाकरेंची मालेगावात सभा २६ मार्चला मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा होतेय, या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. ही सभा ऐतिहासिक होईल. उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी या सभेची आखणी करत आहेत अशी माहिती संजय राऊतांनी दिली.   

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा