शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसेची विचारसरणी एकच, राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 14:42 IST

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज जोरदार टीका केली आहे.

वायनाड - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे यांची विचारसरणी एकच असल्याचा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज वायनाडच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये संविधान बचाओ सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी गांधी हत्येचा धागा पकडून नरेंद्र मोदींवर निषाणा साधला. ''महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारसरणी एकच आहे. त्यात काहीच फरक नाही. केवळ माझी नथुराम गोडसेवर श्रद्धा आहे, हे सांगण्याची हिंमत नरेंद्र मोदींमध्ये नाही,''असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.  यावेळी केंद्राने लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि प्रस्तावित असलेल्या एनआरसीवरही टीका केली,''देशवासीयांना सध्या ते भारतीय असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. मी भारतीय आहे किंवा नाही हे निश्चित करणारे नरेंद्र मोदी कोण?  कोण भारतीय आणि कोण नाही हे निश्चित करण्याचा परवाना त्यांना कुणी दिला. मला माहिती आहे की मी भारतीय आहे. मग ही बाब मी कुणासमोर सिद्ध करण्याची गरज नाही,'' असेही राहुल गांधी म्हणाले. 

 देशातील बेरोजरागी आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेवरूनही राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली. नरेंद्र मोदींना जेव्हा बेरोजगारी आणि नोकऱ्यांसदर्भात प्रश्न विचारले जातात, तेव्हा ते तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत. जम्मू काश्मीरमधील सध्याची परिस्थिती आणि आसामचे पेटण्यामुळेही तुम्हाला रोजगार मिळणार नाहीत, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसwayanad-pcवायनाडNarendra Modiनरेंद्र मोदी