शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi : मुलींच्या लग्नाचे वय 21 म्हणजे महिलांना आत्मनिर्भर बनवणं, मोदींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 16:57 IST

Narendra Modi : सध्या महिलांसाठी विवाहाचे कायदेशीर वय १८ वर्षे आहे, तर पुरुषांसाठी २१ वर्षे आहे. आता, केंद्र सरकारने मुलींचे लग्नासाठीचे वय वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली - मुलीच्या विवाहाचे वय आता १८ वरुन २१ होणार आहे. याबाबतच्या विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. विवाहामुळे शिक्षणाचा डाव अर्ध्यावरच मोडणाऱ्या मुली आता शिक्षण पूर्ण घेतील अन् मानसिक, आर्थिक स्वावलंबी होतील, असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला आहे. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मुलींच्या लग्नाचे वय २१ केल्याने मुली, महिला आत्मनिर्भर होतील, असे म्हटले आहे. 

सध्या महिलांसाठी विवाहाचे कायदेशीर वय १८ वर्षे आहे, तर पुरुषांसाठी २१ वर्षे आहे. आता, केंद्र सरकारने मुलींचे लग्नासाठीचे वय वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुलींच्या लग्नाचे वय वाढविण्यामागचं उद्देश महत्त्वाचा आहे, देशातील महिलांचे सक्षमीकरण, देश की बेटी सक्षम हो.. हाच हेतू आहे. या निर्णयामुळे मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची आणि करिअर करण्याची, आत्मनिर्भर बनण्याची संधी मिळणार असल्याचेही मोदींनी म्हटले. मोदींनी MSME मंत्रालयाच्या तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन केले आणि पेरुन्थलैवर कामराजर मणिमंडपम-पुद्दुचेरीमधील ओपन-एअर थिएटरसह सभागृहातील युवकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

मोदींनी देशातील तरुणाईवर विश्वास व्यक्त करत सांगितले की, 'स्पर्धा करा आणि जिंका' हा नव्या भारताचा मंत्र आहे. आपण स्पर्धा करू शकतो, अशी भावना देशातील तरुणांमध्ये आहे, जी प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असेही मोदींनी यावेळी बोलताना म्हटले. 

करिअरमुळे मुलींच्या लग्नाचे वय लांबले...

शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत मुलींच्या लग्नाच्या वयामध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. मुख्यत: उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींचे लग्नाचे वय २५ वर्षांच्या पुढे गेले असून, २७ ते ३० वर्षे या वयामध्ये लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढले आहे. करिअरमुळे या मुली लग्नाचा निर्णय पुढे ढकलत आहेत.

‘त्या’ कायद्याच्या अंमलबजावणीचे काय झाले ?

देशात बालविवाह विरोधी कायदा अस्तित्वात येऊन १३ वर्षे उलटली, तरी जगातील सर्वाधिक बालविवाह होणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. सर्वाधिक बालविवाह होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिल्या पाच राज्यांमध्ये समावेश आहे. मुलींवरील वाढते अत्याचार आणि त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असा सवाल अनेकांनी लोकमतसमोर उपस्थित केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीWomenमहिलाmarriageलग्न