"भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. देश आणि जगाचा भारतावरील आत्मविश्वास आता वाढला असून 'वारसाहक्कासह विकासाचा मंत्र' आज गुजरातमध्ये सर्वत्र गुंजत आहे," असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कच्छ आणि सौराष्ट्र प्रदेशासाठी आयोजित 'व्हायब्रंट गुजरात रीजनल कॉन्फ्रेंस'च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
२०२६ या वर्षातील आपल्या पहिल्या गुजरात दौऱ्याचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, "सोमनाथ दादांच्या चरणी डोके टेकून माझ्या या प्रवासाची सुरुवात झाली. गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेला व्हायब्रंट गुजरातचा हा प्रवास आता केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून जागतिक विकासाचे प्रतिबिंब ठरत आहे."
मोदी म्हणाले की, गेल्या २० वर्षांत वाइब्रेंट गुजरात ग्लोबल समिट यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्या. सुरुवातीला केवळ गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू झालेले हे अभियान आता आंतरराष्ट्रीय भागीदारीचे एक भक्कम व्यासपीठ बनले. प्रादेशिक विकासाला अधिक गती देण्यासाठी 'प्रादेशिक व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट' हा एक नवीन आणि प्रभावी प्रयोग असल्याचे मोदींनी म्हटले.
तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
पंतप्रधान पुढे म्हणाले की, २१ व्या शतकाचा एक चतुर्थांश भाग उलटून गेला असून उदयोन्मुख आर्थिक आकडेवारी पाहता जगाच्या भारताकडून अपेक्षा सातत्याने वाढत आहेत. एकेकाळी जे स्वप्न म्हणून सुरू झाले होते, त्याचे आता देश आणि जगाच्या आत्मविश्वासात रूपांतर झाले. या समिटच्या निमित्ताने आयोजित भव्य व्यापार प्रदर्शनाचे आणि प्रदर्शनाचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील उद्योजक आणि मान्यवर उपस्थित होते.
Web Summary : PM Modi asserted India's rapid progress towards becoming the world's third-largest economy. He highlighted the increasing global confidence in India, noting Vibrant Gujarat's evolution into a global development catalyst. The summit fosters international partnerships and regional growth, boosting expectations for India's economic future.
Web Summary : पीएम मोदी ने कहा कि भारत दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने की ओर तेजी से बढ़ रहा है। उन्होंने भारत में बढ़ते वैश्विक विश्वास पर प्रकाश डाला और बताया कि वाइब्रेंट गुजरात वैश्विक विकास का उत्प्रेरक बन गया है। यह शिखर सम्मेलन अंतर्राष्ट्रीय भागीदारी और क्षेत्रीय विकास को बढ़ावा देता है, जिससे भारत के आर्थिक भविष्य की उम्मीदें बढ़ रही हैं।