शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंनी कंबर कसली! रेल्वे मंत्र्यांची घेतली भेट, कोकणवासीयांसाठी केल्या ३ प्रमुख मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 13:56 IST

केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे कामाला लागले असून, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकणवासीयांसाठी ३ महत्त्वाच्या मागण्या केल्याची माहिती मिळाली आहे.

नवी दिल्ली: केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेते १६ ऑगस्टपासून राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. केंद्र सरकारचे चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवितानाच राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्र सोडणे, अशी या यात्रेची दुहेरी रणनीती असेल, असे सांगितले जात आहे. यातच आता केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे कामाला लागले असून, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकणवासीयांसाठी ३ महत्त्वाच्या मागण्या केल्याची माहिती मिळाली आहे. (narayan rane meets railway minister ashwini vaishnav and give proposal 3 demands for konkan)

“...नाहीतर शिवसेनेला २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल”; रामदास आठवलेंचा सूचक इशारा

केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री नारायण राणे, डॉ . भारती पवार , डॉ . भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी येत्या १६ ऑगस्टपासून हे मंत्री राज्याच्या वेगवेगळया भागात जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली. यानंतर लगेचच नारायण राणे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. 

Paytm ला मोठा धक्का! IPO रोखा, गंभीर आरोप करत माजी संचालकांची सेबीकडे मागणी 

कोकणवासीयांसाठी तीन प्रमुख मागण्यांचा प्रस्ताव

नारायण राणे यांनी कोकणवासियांना फायदेशीर ठरू शकतील, असे तीन प्रस्ताव अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडले. यामध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जादा ट्रेन सोडण्यात याव्यात. तसेच कोकण रेल्वेमार्गावर ट्रॅकलगत नारळाची झाडे लावण्यासाठी जमीन द्यावी आणि कुडाळ तालुक्यात टू लेन रोडला परवानगी मिळावी, अशा तीन मागण्या नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या. यानिमित्ताने नारायण राणे यांनी कोकणाच्या विकासाच्या माध्यमातून राजकीय फासे टाकायला सुरुवात केल्याची चर्चा आहे.

भारताला तुम्ही शत्रू मानता की मित्र?; तालिबानने स्पष्टच सांगितले

दरम्यान, यात्रेचे प्रमुख आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, कपिल पाटील यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट दरम्यान ठाणे व रायगड जिल्ह्यात ५७० किलोमीटरची यात्रा काढतील. याच काळात डॉ. भारती पवार या नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ४३१ किलोमीटरची यात्रा काढतील. डॉ. भागवत कराड मराठवाड्यात ६२३ किलोमीटर यात्रा काढतील. पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे प्रारंभाला सोबत असतील. नारायण राणे यांची यात्रा मुंबईतून १९ ऑगस्टला सुरू होईल. वसई- विरार महापालिका क्षेत्र आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही यात्रा २५ ऑगस्टपर्यंत ६५० किलोमीटरचा प्रवास करेल. या यात्रेत चारही मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेतील. तसेच केंद्र सरकारी योजनांच्या लाभार्थींशीही संवाद साधतील. भागवत कराड हे मराठवाड्यात ६२३ किलोमीटर यात्रा काढतील. पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे प्रारंभाला सोबत असतील. नारायण राणे यांची यात्रा मुंबईतून १९ ऑगस्टला सुरू होईल.  

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वेBJPभाजपा