शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नारदमुनी म्हणजे प्राचीन काळातील गुगलच; भाजपाचे आणखी एक नेते पोहोचले पुराणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 12:22 IST

भाजपच्या नेत्यांमध्ये अकलेचे तारे तोडण्याची स्पर्धा

अहमदाबाद: महाभारत काळात इंटरनेट होतं, असं विधान करुन त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी अकलेचे तारे तोडले. यानंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी नवी मुक्ताफळं उधळली आहेत. गुगलला ज्याप्रकारे संपूर्ण संपूर्ण जगाची माहिती आहे, तशाच प्रकारे नारदमुनींना संपूर्ण जगाची माहिती असायची, असं रुपानी यांनी म्हटलंय. 'नारदमुनी अशी व्यक्ती होती, जिच्याकडे संपूर्ण जगाची माहिती होती. ते माहितीवर काम करायचे. मानवतेच्या भल्यासाठी ते सर्व माहिती गोळा करायचे आणि या कामाची खूप आवश्यकता होती,' असं रुपानी म्हणाले.अहमदाबादमध्ये आरएसएसच्या शाखा विश्व संवाद केंद्राकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रुपानी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. 'गुगल नारदमुनींप्रमाणेच माहितीचा स्रोत आहे. गुगलकडे जगात घडणाऱ्या सर्व घटनांची माहिती असते. नारदमुनींकडेदेखील अशाच प्रकारे संपूर्ण जगाची माहिती असायची,' असं रुपानी यांनी म्हटलं. रुपानी यांच्या आधी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी, महाभारताच्या काळात इंटरनेट होतं, असा अजब दावा केला होता. अमेरिका किंवा इतर कोणत्याही पाश्चिमात्य देशानं नव्हे, तर भारतानं शेकडो वर्षांपूर्वीच इंटरनेटचा शोध लावला होता, असं देब यांनी म्हटलं होतं. भाजपाचे मुख्यमंत्री अनेक वादग्रस्त विधानं करत असताना केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही स्टिफन हॉकिंग यांच्या मृत्यूनंतर हास्यास्पद विधान केलं होतं. 'ब्रह्मांडाचा अभ्यास करणाऱ्या हॉकिंग यांनी वेदांमध्ये असलेला सापेक्षतावादाचा सिद्धांत आईनस्टाईन यांच्या  e=mc^2 पेक्षा जास्त चांगला असल्याचं म्हटलं होतं,' असं हर्षवर्धन यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Vijay Rupaniविजय रूपाणीBJPभाजपा