शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

तीन शिंगे, तीन डोळे असलेल्या नंदी बैलाचे निधन; मंदिराच्या आवारातच अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 09:03 IST

जटाशंकर धाम बुंदेलखंड प्रदेशातील बिजावर तहसीलपासून जवळपास 15 किमी अंतरावर आहे.

छतरपूर : वेदांनी बैलाला धर्माचा अवतार मानले आहे. वेदांमध्ये गायीपेक्षा बैलाला अधिक मौल्यवान असल्याचे म्हटले जाते. दुसरीकडे, जेव्हा नंदी बैलाचा विचार केला जातो, तेव्हा तो भगवान शिवाच्या प्रमुख गणांपैकी एक आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बुंदेलखंडमधील केदारनाथ धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या जटाशंकर धाम येथील एका नंदी बैलाचे निधन झाले. यानंतर या नंदी बैलाचे हिंदू विधींनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

तीन शिंगे आणि तीन डोळे असलेल्या नंदी बैलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. मंदिर समितीच्या सदस्यांनी नंदी बैलाचा अंत्यसंस्कार विधींनुसार ब्राह्मणांच्या उपस्थितीत मंत्रपठण करण्याचा निर्णय घेतला. गेली 15 वर्षे नंदी ज्या ठिकाणी बसत असे. त्याच ठिकाणी नंदीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मंदिर समितीने ज्या ठिकाणी नंदी नेहमी बसायचा, त्याच ठिकाणी खड्डा खोदून नंदीची समाधी तयार केली. 

हा नंदी बैल 15 वर्षांपूर्वी जटाशंकर येथे फिरत फिरत आला होता.  तीन डोळे आणि तीन शिंगांमुळे हा बैल जटाशंकर धाममध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. जेव्हापासून हा बैल याठिकाणी आला. तेव्हापासून लोकांनी त्यांचे नाव नंदी ठेवण्यात आले, जे काही भक्त जटाशंकर धामला येत असत. ते थोडावेळ नंदीजवळ थांबायचे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत होते. 

नंदी बैलाच्या मृत्यूनंतर महिलांनी नंदीच्या मृतदेहाजवळ बसून भजन कीर्तन केले. तसेच, ज्या ठिकाणी नंदीला समाधी देण्यात आली आहे, त्या जागेचा समिती स्मृतिस्थळ म्हणून विकास करणार आहे, असे मंदिर समितीचे अध्यक्ष अरविंद अग्रवाल यांनी सांगितले. 

येथील कुंडांतील पाण्याचे तापमान हवामानाच्या विरुद्ध दरम्यान, जटाशंकर धाम बुंदेलखंड प्रदेशातील बिजावर तहसीलपासून जवळपास 15 किमी अंतरावर आहे. आजूबाजूला सुंदर पर्वतांनी वेढलेले शिवमंदिर आहे. हे मंदिर धार्मिक श्रद्धेचे मोठे केंद्र आहे. या मंदिरावर तीन लहान पाण्याची टाकी आहेत, ज्यांचे पाणी कधीच संपत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कुंडांतील पाण्याचे तापमान नेहमीच हवामानाच्या विरुद्ध असते. तसेच, येथील पाण्यात आंघोळ केल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते, असे म्हटले जाते.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यू