नांद जोड
By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:03+5:302014-12-25T22:41:03+5:30
साहित्य भंगारात

नांद जोड
स हित्य भंगारातगेल्या ४० वर्षांपासून चोरविहिरा जलाशयाच्या कालव्याचे काम रखडले आहे. त्यातच बऱ्याच ठिकाणी कालवा जमीनदोस्त झाला आहे. कालवा नेमका कोणत्या जागेतून आहे, हे कळायला मार्ग नाही. यासोबतच जलाशयातून पाणी सोडण्यासाठी उपयोगात येणारे दाराची स्थिती दयनीय आहे. कुजलेल्या स्थितीत ते दार आहे. या जलाशयाच्या माध्यमातून महसूल मिळत नसल्याने पाटबंधारे विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे........लोकप्रतिनिधींची उदासीनताकित्येक वर्षांपासून रखडलेल्या चोरविहिरा जलाशयाच्या कालव्याचे काम सुरू करावे, शेतकऱ्यांना त्या जलाशयाचा फायदा मिळावा यासाठी सकारात्मक पावले उचलावी या आशयाची निवेदने शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग, वन विभागासह आमदार, खासदार, मंत्र्यांना दिली. परंतु, त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली. सध्या या भागाचे विधानसभेत सुधीर पारवे हे नेतृत्व करीत आहे. लोकसभेत कृपाल तुमाने हे आहेत. राज्यात आणि देशात त्यांच्याच पक्षाची सत्ता आहे. या खासदार, आमदारांकडे बऱ्याचदा नागरिकांनी समस्या मांडली. मात्र त्याचाही काहीएक फायदा झाला नाही. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने कालव्याचे काम अद्याप मार्गी लागू शकले नाही.