शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

नगरोटा चकमकीवर धक्कादायक खुलासा; जवानांनी मोठा कट उधळला, भारतात असे घुसले होते दहशतवादी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 14:40 IST

दहशतवाद्यांकडून 11 एके-47 रायफल आणि 3 पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. प्रत्येक दहशतवादी जवळपास 3 एके-47 रायफल घेऊन जात होता.

ठळक मुद्देहे दहशतवादी पाकिस्तानातील शकरगडहून सांबा सेक्टरमध्ये भूयारी मार्गाने आले होते.11 एके-47 रायफल आणि पिस्तुलही जप्त करण्यात आली आहेत. जानेवारी महिन्यातही अशाच प्रकारची चकमक झाली होती, त्यात 3 दहशतवादी मारले गेले होते.

श्रीनगर - नगरोटा चकमकीसंदर्भात तपास करणाऱ्या संरक्षण दलाच्या संस्थांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरीसाठी भूयारी मार्गाचा वापर केल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. हे दहशतवादीपाकिस्तानातील शकरगडहून सांबा सेक्टरमध्ये भूयारी मार्गाने आले होते. तसेच, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सामानातील शस्त्र आणि दारूगोळा आधीपासूनच ट्रकमध्ये होता, अशी शक्यताही संरक्षण संस्थांनी व्यक्त केली आहे.

संरक्षण संस्थांनी दावा केला, की सीमेवर तार फेंसिंग सोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही. यामुळे भूयारी मार्गानेच दहशतवादी सांबा सेक्टरमध्ये आले असल्याचे मानले जात आहे. खरे तर भूयारी मार्गाने दहशतवादी भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे नाही.

भरतीय जवानांनी मोठा कट उधळला -जम्मूमध्ये नगरोटाजवळ गुरुवारी झालेल्या चकमकीत मारले गेलेले जैशचे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर दारूगोळा घेऊन जात होते. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 11 एके-47 रायफल आणि पिस्तुलही जप्त करण्यात आली आहेत. या दहशतवाद्यांचा मोठा कट असण्याची पूर्ण शक्यता आहे. हे चारही दहशतवादी काश्मीरकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये होते. पोलिसांनी हा ट्रक टोल प्लाझाजवळ थांबवला होता. यानंतर उडालेल्या चकमकीत हे चारही दहशतवादी मारले गेले.

11 एके-47 रायफल आणि 3 पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त -दहशतवाद्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला गुरुवारी सकाळी 5 वाजेच्या सुमारास आडवण्यात आले, तेव्हा ट्रक ड्रायव्हर गडबडला आणि ट्रकमधून उडी मारून पळून गेला. यानंतर त्या ट्रकमधून पोलिसांच्या चमूवर गोळीबार सुरू झाला. नंतर प्रत्युत्तरातील कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी मारले गेले. त्यांच्याकडून 11 एके-47 रायफल आणि 3 पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. प्रत्येक दहशतवादी जवळपास 3 एके-47 रायफल घेऊन जात होता. यापूर्वी जानेवारी महिन्यातही अशाच प्रकारची चकमक झाली होती. त्यात 3 दहशतवादी मारले गेले होते.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत