शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एएन 32 चे रहस्यमयी अपघात; यापूर्वीची 2 विमाने अद्याप बेपत्ताच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 19:42 IST

3 जूनला झालेल्या अपघातातील विमानाचे अवशेष शोधण्यासाठी भारताची तिनही सैन्यदले प्रयत्न करत होती.

जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हवाई दलाच्या 13 जवानांना नेणारे मालवाहू विमान अरुणाचलच्या डोंगररांगांमध्ये गायब झाले होते. मात्र, युद्धस्तरावर शोध घेतल्यानंतर हे विमान भारतीय सैन्याला सापडले असून 13 जण शहीद झाले आहेत. एएन 32 हे विमान गायब होण्याचे प्रकार या आधीही भारतासोबत घडले आहेत. मात्र, या प्रकारामागचे कारण शोधण्यास अपयश आले आहे. 

3 जूनला झालेल्या अपघातातील विमानाचे अवशेष शोधण्यासाठी भारताची तिनही सैन्यदले प्रयत्न करत होती. यापूर्वीही दोन विमाने गायब झाली असून अद्याप या विमानांचा शोध लागलेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या विमानाचे अवशेष ज्या भागात मिळाले आहेत त्या भागात या आधीही अनेकदा विमानांचे अवशेष सापडलेले आहेत. यामध्ये दुसऱ्या विश्व युद्धातील विमानांची संख्या जास्त आहे. 

1986 मध्ये गायब झालेले पहिले विमानएएन-32 च्या गायब होण्याची पहिली घटना 25 मार्च 1986 मध्ये घडली. सोव्हियत युनियन आणि ओमानच्या वाटेने हे विमान भारतात येत होते. हिंदी महासागरावर असताना हे विमान गायब झाले. या विमानामध्ये सातजण होते. आजपर्यंत या विमानाचा थांगपत्ता लागलेला नाही. 

2016 मध्ये दुसरी घटनाजुलै 2016 मध्ये बंगालच्या खाडीवरून एएन-32 चे दुसरे विमान गायब झाले होते. या विमानामध्ये 29 जण प्रवास करत होते. भारतीय हवाई दलाने महिनाभर शोध घेतला होता. मात्र, याही विमानाबाबत काही पत्ता लागला नाही. 

नुकतीच झालेली विमान दुर्घटना ही तिसरी होती. मात्र, या विमानाचे अवशेष मिळाल्याने हवाई दलाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. एएन-32 याच विमानाच्या बाबतीत या घटना का होतात याचे उत्तर कोणाकडेच नाही.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलAccidentअपघात