शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमारचे सैनिक भारताच्या हद्दीत घुसले, लष्कर सज्ज! ३ ठिकाणी परिस्थिती चिंताजनक: लष्करप्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 11:59 IST

भारत-म्यानमार सीमेवरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही केलं स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: म्यानमारमधील सशस्त्र जातीय गट आणि सरकारी सैन्य यांच्यातील लढाईमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर  म्यानमारचे ४१६ सैनिक भारतात आले असून घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी गुरुवारी सांगितले. लष्कर दिनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत जनरल पांडे यांनी भारत-म्यानमार सीमेजवळील परिस्थिती चिंताजनक असल्याचे वर्णन केले आणि काही बंडखोर गटांना त्या देशाच्या सीमावर्ती भागात दबाव जाणवत आहे आणि ते मणिपूरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती दिली.

भारत-म्यानमार सीमेवरील परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. म्यानमारच्या सर्व ४१६ लष्करी कर्मचाऱ्यांना आधीच मायदेशी पाठवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

चीन-भूतान विवादही रडारवर

  • भूतान आणि चीन यांच्यातील सीमा विवाद सोडविण्यासाठी चर्चेबाबत विचारले असता, जनरल पांडे म्हणाले की, भारताच्या सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवले जातेय.
  • आमचे भूतानसोबत मजबूत लष्करी सहकार्य आहे. भारत-म्यानमार सीमेवरील परिस्थिती चिंतेची बाब आहे. आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही त्यांनी सांगितले.

पूर्व लडाखमध्ये स्थिती संवेदनशील, मात्र...

  • पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील परिस्थिती स्थिर; परंतु, संवेदनशील आहे आणि कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारतीय सैन्याने उच्च सज्जता ठेवली आहे.
  • जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरीचे प्रयत्न झाले असले तरी नियंत्रण रेषेवर पाकसोबत युद्धविराम सामंजस्य कायम आहे.
  • आम्ही नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडत आहोत. 
  • जम्मू-काश्मीरमध्ये एकूणच हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचे ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरमध्येही...

जम्मू-काश्मीरच्या राजौरी-पूंछ भागातील स्थिती ही चिंतेची बाब आहे. तेथील दहशतवादी कारवाया रोखण्याकरिता तैनात सैनिकांची संख्या वाढविणे, गुप्तचर यंत्रणा अधिक सक्रिय करणे, स्थानिक लोकांशी संपर्क वाढविणे ही कामे हाती घेण्यात आली असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले.

भारत दुबळा नाही, कोणीही डोळे वटारून पाहू नये : संरक्षणमंत्री

गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर चीनचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. भारत आता दुबळा देश नाही, त्याच्याकडे आता कोणीही डोळे वटारून पाहू शकत नाही हे चीनच्या लक्षात आले, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांच्या ब्रिटन दौऱ्याचा बुधवारी समारोप झाला. एका भाषणात ते म्हणाले की, आर्थिक व परराष्ट्र धोरणामध्ये बदल केल्यामुळेच भारत आता जगातील एक प्रमुख देश म्हणून ओळखला जातो हे सत्य चीनने आता स्वीकारले आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानMyanmarम्यानमारIndiaभारत