शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

भारतात शिरले रक्तानं माखलेले म्यानमारचे लोक, 5000 जणांनी केलं सरेंडर; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 17:29 IST

बॉम्बस्फोटांमधून जीव वाचविण्यासाठी म्यानमारमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भारतात प्रवेश केला आहे. महत्वाचे म्हणजे, यांत म्यानमारच्या 39 सैनिकांचाही समावेश होता.

भारताच्या सीमेला लागून असलेल्या म्यानमारमधील एका गावात रविवारी रात्री लष्कर आणि बंडखोरांमध्ये जोरदार चकमक उडाली. यावेळी, जबरदस्त गोळीबारही झाला आणि बॉम्बफेकही करण्यात आली. या बॉम्बस्फोटांमधून जीव वाचविण्यासाठी म्यानमारमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भारतात प्रवेश केला आहे. महत्वाचे म्हणजे, यांत म्यानमारच्या 39 सैनिकांचाही समावेश होता.

यासंदर्भात, मिझोरम पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीपल डिफेन्स फोर्स, चायना डिफेन्स फोर्स आणि चिन नॅशनल आर्मी नावाच्या बंडखोर संघटनांनी रिखिद्वार आणि खावमावी येथे असलेल्या म्यानमार आर्मीच्या चौक्यांवर गोळीबार केला. हे गाव मिझोरामच्या चंपाई जिल्ह्यातील जोख्तावतार जवळ आहे.

रात्रभर चालला गोळीबार -बंडखोरांचा हा गोळीबार रात्रभार सुरू होता, असे समजते. बंडखोर गटांनी म्यानमार लष्कराच्या चौक्यांवर कब्जा केला आहे आणि तेथील सैनिकांना पळवून लावले आहे. यानंतर, सोमवारी सकाळी म्यानमार लष्कराने येथे बॉम्बफेक सुरू केल्यानंतर, येथील लोक स्वतःचा जीव वाचवून आश्रयासाठी भारतात शिरले आहेत. मिझोरम पोलीस आयजी लालबियाक्ख्तंगा खियांग्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारील देशातून 39 सैनिक आणि 5000 म्यानमारचे नागरिक भारतात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार या सर्वांना सीमेवर तैनात असलेल्या आसाम रायफल्सच्या जवानांकडे सोपवण्यात आले आहे.

म्यानमारच्या सैनिकांना परत पाठवलं -माध्यमांतील वृत्तांनुसार, मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या विमानाने म्यानमारच्या 39 सैनिकांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात आले आहे. खियांग्ते म्हणाले, 5 हजार लोकांपैकी 21 जण जखमी झाले आहेत. यांतील आठ जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी आयजोल येथे पाठविण्यात आले आहे. याशिवाय इतरांना चंपाईच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

टॅग्स :Myanmarम्यानमारSoldierसैनिकFiringगोळीबार