शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

माझे आई-वडिल कोण आहेत विचारणा-यांनो हा देशच माझं सर्वस्व, नरेंद्र मोदींचं काँग्रेसला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 12:47 IST

माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशाला आणि 125 कोटी भारतीयांना वाहिलेला आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. काँग्रेस नेत्यांकडून होणा-या टिकेवर बोलताना नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं आहे. 

नवी दिल्ली - जे काँग्रेस नेते माझा अपमान करत आहेत, माझ्याविरोधात असभ्य भाषा वापरत आहेत, माझे आई-वडिल कोण आहेत विचारतात त्यांना मला सांगायचं आहे की, हा देशच माझं सर्वस्व आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशाला आणि 125 कोटी भारतीयांना वाहिलेला आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. काँग्रेस नेत्यांकडून होणा-या टिकेवर बोलताना नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं आहे. 

'काँग्रेसमध्ये एक तरुण नेता आहे सलमान निझामी नावाचा, जो काँग्रेससाठी गुजरातमध्ये प्रचार करत आहे. त्याने ट्विटरवर राहुल गांधींचे वडिल आणि आजीबद्दल लिहिलं आहे. इथपर्यंत ठीक आहे, पण त्याने विचारलं की, मोदी तुमची आई कोण आहे का सांगा ? वडिल कोण आहेत ? आपल्या शत्रुंसाठी ही भाषा वापरली जाऊ शकत नाही', असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. 

'सलमान निझामीने आपल्या ट्विटरवरुन आझाद काश्मीरची मागणी केली आहे. त्याने आपल्या लष्कर जवानांनी बलात्कारी म्हटलं आहे. सलमान निझामीसारख्या लोकांना कसं काय स्विकारलं जाऊ शकतं ? प्रत्येक घरातून अफजल निघेल असंही त्याने म्हटलं आहे', असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

 

'काँग्रेसला देशाने संपुर्णपणे नाकारलं आहे. गुजरातची जनतादेखील काँग्रेसला नाकारुन त्यांनी केलेल्या राजकारणाची शिक्षा त्यांना नक्की देईल', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यावेळी नरेंद्र मोदींनी काँग्रेसने मुस्लिमांना भरकटवलं असल्याचा आरोप केला. 'देशातील प्रत्येक भागात काँग्रेसने मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचं काम केलं आहे. त्यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची आश्वासने दिली, पण एकाही राज्यात ते पुर्ण केलं नाही', अशी विचारणा नरेंद्र मोदींनी केली.

आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत 9.77 टक्के मतदान झालं आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरु असणार आहे. आज 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान होत आहे. तर 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 89 जागा असून त्यांतील 53 जागा या ग्रामीण भागतील आहेत तर 36 जागा या शहरी भागातील आहे. सध्या ग्रामीण भागातील 53 जागांपैकी भाजपकडे 32 आणि काँग्रेसकडे 17 जागा आहेत. तर शहरी भागातील 36 जागांपैकी भाजपकडे तब्बल 31 आणि काँग्रेसकडे फक्त 5 जागा आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी