शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

'माझं नाव राहुल सावरकर नव्हे, राहुल गांधी; माफी कदापि मागणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 15:30 IST

नरेंद्र मोदींनी काय करून ठेवले ? आता हे लोक कांदे हातात घेऊन बसले आहेत, असंही राहुल गांधी यांनी म्हटले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर जोरदार टीका केली.  

नवी दिल्ली - महिलांवर होणाऱ्या आत्याचारांवरून सरकारवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांना भाजपकडून लोकसभेत लक्ष्य करण्यात आले होते. तसेच राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. या मागणीचा  राहुल गांधी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी सावरकरांचे नाव घेऊन केंद्र सरकारला डिवचले.  

राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित काँग्रेसच्या 'भारत बचाव' सभेत ते बोलत होते. राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आक्रमक भूमिका घेत भाजपवर हल्ला चढवला. भाजपकडून माफीच्या मागणीचा समाचार घेत ते म्हणाले की, 'माझ नाव राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही. मी सत्यासाठी कधीही माफी मागणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची मागायची आहे. मोदींसह त्यांचा असिस्टंट असलेल्या अमित शाह यांनी देशाची माफी मागायची आहे. 

देशाची आत्मा आणि शक्ती अर्थव्यवस्था आहे. संपूर्ण जग आपल्याकडे पाहायचे. हा देश वेगवेगळ्या धर्मांचा, जातींचा आणि विचारधारांचा आहे. या देशाचा जीडीपी 9 वर कसा असा विचार इतर देश करत होते. परंतु, नरेंद्र मोदींनी काय करून ठेवले ? आता हे लोक कांदे हातात घेऊन बसले आहेत, असंही राहुल गांधी यांनी म्हटले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर जोरदार टीका केली.