शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Corona Vaccine: आधी माझा देश, जगाने धीर धरावा; कोरोना लसीवर सीरमच्या अदार पुनावालांचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 16:51 IST

serum institute's Covishield in demand By worldwide: जगभरातून मोठी मागणी असल्याने सीरमकडे अनेक देशांकडून सारखी विचारणा होत आहे. कोरोना लस कधी देणार, असे प्रश्न विचारले जात आहेत. यावर पुनावाला यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे.

कोणत्याही संकटात काही लोक संधीसाधूपणा करतात, फायदा पाहतात. पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूटच्या (SII) कोविशिल्ड कोरोना लसीला (Corona Vaccine) जगभरातून जोरदार मागणी आहे. भारतात दिली तर कमी रुपयांत आणि जगभरात दिली तर ते देश सांगतील त्या किंमतीला विकत घेतील अशी परिस्थिती आहे. मात्र, सीमरचे सीईओ अदार पुनावाला यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (SerumInstIndia has been directed to prioritise the huge needs of India and along with that balance the needs of the rest of the world. We are trying our best.: adar poonawalla)

जगभरातून मोठी मागणी असल्याने सीरमकडे अनेक देशांकडून सारखी विचारणा होत आहे. कोरोना लस कधी देणार, असे प्रश्न विचारले जात आहेत. यावर पुनावाला यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. 'आदरणीय देश आणि सरकारे, जसे की तुम्ही लोक कोविशिल्ड लसीच्या पुरवठ्याची वाट पाहत आहात. मी तुम्हा सर्वांना विनम्रतेने निवेदन करतो की, तुम्ही सर्वांनी धीर धरावा. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने भारतातील कोरोना लसीकरणाच्या गरजांना प्राथमिकता देण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर अन्य देशांच्या मागण्याही पूर्ण करण्यासाठी संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहोत.', असा संदेश त्यांनी जगाला दिला आहे. 

सीरम इन्स्टीट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटीश-स्वीडनची कंपनी एस्ट्राझिनेकाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन घेत आहे. सीरम भारत सरकारसोबत अन्य बाजारांसाठीही कोरोना लस बनवत आहे. केंद्र सरकारला जुलैपर्यंत ३० ते ४० कोटी डोस द्यायचे आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या योजनेनुसार देशातील २० ते ३० टक्के लोकसंख्येला कोरोना लस टोचायची आहे. ऑक्टोबरपर्यंत देशातील जास्तीत जास्त लोकसंख्येला कोरोना लस दिली जाणार आहे. तेव्हाच लोकांचे आयुष्य पूर्वीसारखे सामान्य होणार आहे. 

भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. अशावेळी कोरोनाचा उद्रेक थोपविण्यासाठी देशात कोरोना लसीची मोठी गरज आहे. देशात खरी गरज असताना भारताने जगाशी असलेले देणे न विसरता कोरोना लस विविध देशांना पुरवत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांना भारताने दोन लाख कोरोना लसीचे डोस देऊ केले आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या