युती तोडली म्हणून माझ्या ७०० पिढ्या काढल्या

By Admin | Updated: November 1, 2015 00:26 IST2015-11-01T00:26:46+5:302015-11-01T00:26:46+5:30

जळगाव- युती तुटली नसती तर भाजपाचा मुख्यमंत्री झाला नसता. युती तोडल्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतल्यानंतर तो निरोप पोहोचविण्याची जबाबदारी माझ्यावर दिली. युती तोडल्याचा निरोप फक्त मी शिवसेनेला दिला. म्हणून शिवसेनेला नाथाभाऊ दिसतो. पण शिवसेने गद्दारी केली. जळगाव जिल्ह्याने ती अनुभवली. यामुळे आपला पुत्र निखील खडसे पराभूत झाला. आमच्या मोठ्या भावाचे (शिवसेनेचे) मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगले म्हणून माझ्या ७०० पिढ्या काढल्या, अशी आगपाखड महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी भाजपातर्फे सरकारच्या वर्षपूर्तर्ीनिमित्त आयोजित जाहीर सभेत केली.

My 700 generations were removed as the coalition broke | युती तोडली म्हणून माझ्या ७०० पिढ्या काढल्या

युती तोडली म्हणून माझ्या ७०० पिढ्या काढल्या

गाव- युती तुटली नसती तर भाजपाचा मुख्यमंत्री झाला नसता. युती तोडल्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतल्यानंतर तो निरोप पोहोचविण्याची जबाबदारी माझ्यावर दिली. युती तोडल्याचा निरोप फक्त मी शिवसेनेला दिला. म्हणून शिवसेनेला नाथाभाऊ दिसतो. पण शिवसेने गद्दारी केली. जळगाव जिल्ह्याने ती अनुभवली. यामुळे आपला पुत्र निखील खडसे पराभूत झाला. आमच्या मोठ्या भावाचे (शिवसेनेचे) मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगले म्हणून माझ्या ७०० पिढ्या काढल्या, अशी आगपाखड महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी भाजपातर्फे सरकारच्या वर्षपूर्तर्ीनिमित्त आयोजित जाहीर सभेत केली.
शहरात सुभाष चौकात रात्री ही सभा झाली. व्यासपीठावर खासदार ए.टी.पाटील, रक्षा खडसे, जि.प.अध्यक्ष प्रयाग कोळी, प्रवक्ते माधव भंडारी, आमदार हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, उन्मेष पाटील, सुरेश भोळे, जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन, विधान परिषद आमदार स्मिता वाघ, गुरूमुख जगवानी, जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे, गजानन जोशी, राजेंद्र फडके आदी उपस्थित होते.
भाजपाचे एकट्याच्या बळावर सरकार
युती तुटली म्हणून राज्यात इतिहासात प्रथमच भाजपाचे सरकार आले. शपथविधीनंतर शिवसेना सोबत आली. पण युतीत जे मोठा भाऊ म्हणून आम्हाला हिणवत होते ते लहान भाऊ झाले. युती तुटली नसती तर मोठ्या भावाकडेच मुख्यमंत्रीपद राहीले असते, असेही खडसे म्हणाले.

आपच्या प्रीती आल्या, त्यांनी माझे नाव घेतले
इकडे आपच्या प्रीती आल्या होत्या. त्यांनी माझे नाव घेतले. आपले नाव मोठे करण्यासाठी कुणीही माझे नाव कुठेही जोडते, अशी टिका खडसेंनी केली.

वृत्तपत्र माझे नाव छापून टीआरपी वाढवताहेत
अनेक वृत्तपत्रांना नाथाभाऊ दिसतो. आपला टीआरपी वाढविण्यासाठी ते माझ्यावर लेख छापतात. नाथाभाऊच्या नावाशिवाय वृत्तपत्रांचा टिआरपी वाढत नाही. त्यांना मी आवडतो. अधून मधून आठ-१५ दिवस ते माझे नाव घेत राहतात. पण कुणी कितीही उलटे, सुलटे लेख छापले, तरी मी निवडून येईलच, असेही खडसे म्हणाले.

उपस्थितांमधून कापसावर बोलण्याची मागणी
खडसे आपले भाषण करीत असताना उपस्थितांमध्ये असलेल्या एका व्यक्तीने कापसाचे काय, असे जोरात ओरडत विचारले. त्यानंतर खडसे कापसाच्या मुद्द्यावर आले. सध्या कापसाला ४५०० भाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिती सुधारत आहे. आम्ही कापसाच्या बियाण्याचे दर कमी केले. पेट्रोलचा दर लीटरमागे २० रुपयांनी कमी केला. रेल्वे भाडेवाढ केली नाही, शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्नकेला,असेहीखडसेम्हणाले.

Web Title: My 700 generations were removed as the coalition broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.