शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

काँग्रेससाठी जे मुस्लीम, ते आमच्यासाठी भारतीय; पंतप्रधान मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 14:43 IST

मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरही टीका केली. त्याकाळी कोणाला तरी पंतप्रधान व्हायचे होते, म्हणूनच देशाची फाळणी करण्यात आल्याचे मोदींनी सांगितले. 

नवी दिल्ली - केंद्र सरकार देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी लोकसभेत निवेदन केले. यावेळी मोदींनी कलम 370, तिहेरी तलाक, रामजन्मभूमीवरून भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. 

मोदी पुढे म्हणाले की, विरोधकांना वाटते की नागरिकता संशोधन कायदा आणण्याची एवढी घाई का केली. काही म्हणतात आम्ही हिंदू-मुस्लीम करत आहोत. देशातील नागरिकांना विभागण्याचा आमचा प्रयत्न  आहे. ही भाषा पाकिस्तानची आहे. या लोकांना मुस्लिमांमध्ये भ्रम निर्माण करायचा आहे. मात्र त्याचा उपयोग होणार नसल्याचे मोदींनी सांगितले. 

दरम्यान काँग्रेससाठी देशातील जे लोक मुस्लीम आहेत. ते आमच्यासाठी भारतीय आहे. आम्हाला आठवण करून देण्यात येते की, भारत छोडो आणि जय हिंदचा नारा देणारे मुस्लीम होते. येथेच अडचण आहे. काँग्रेससाठी हे लोक कायम मुस्लीम होते. मात्र आमच्या दृष्टीने हे लोक केवळ भारतीय आहेत, असं मोदी म्हणाले. 

यावेळी मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरही टीका केली. त्याकाळी कोणाला तरी पंतप्रधान व्हायचे होते, म्हणूनच देशाची फाळणी करण्यात आल्याचे मोदींनी सांगितले.