शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

काँग्रेससाठी जे मुस्लीम, ते आमच्यासाठी भारतीय; पंतप्रधान मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 14:43 IST

मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरही टीका केली. त्याकाळी कोणाला तरी पंतप्रधान व्हायचे होते, म्हणूनच देशाची फाळणी करण्यात आल्याचे मोदींनी सांगितले. 

नवी दिल्ली - केंद्र सरकार देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी लोकसभेत निवेदन केले. यावेळी मोदींनी कलम 370, तिहेरी तलाक, रामजन्मभूमीवरून भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. 

मोदी पुढे म्हणाले की, विरोधकांना वाटते की नागरिकता संशोधन कायदा आणण्याची एवढी घाई का केली. काही म्हणतात आम्ही हिंदू-मुस्लीम करत आहोत. देशातील नागरिकांना विभागण्याचा आमचा प्रयत्न  आहे. ही भाषा पाकिस्तानची आहे. या लोकांना मुस्लिमांमध्ये भ्रम निर्माण करायचा आहे. मात्र त्याचा उपयोग होणार नसल्याचे मोदींनी सांगितले. 

दरम्यान काँग्रेससाठी देशातील जे लोक मुस्लीम आहेत. ते आमच्यासाठी भारतीय आहे. आम्हाला आठवण करून देण्यात येते की, भारत छोडो आणि जय हिंदचा नारा देणारे मुस्लीम होते. येथेच अडचण आहे. काँग्रेससाठी हे लोक कायम मुस्लीम होते. मात्र आमच्या दृष्टीने हे लोक केवळ भारतीय आहेत, असं मोदी म्हणाले. 

यावेळी मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरही टीका केली. त्याकाळी कोणाला तरी पंतप्रधान व्हायचे होते, म्हणूनच देशाची फाळणी करण्यात आल्याचे मोदींनी सांगितले.