शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जन्मदर घटूनही देशातील मुस्लिम टक्का वाढला!

By admin | Updated: August 26, 2015 05:25 IST

गेली तीन दशके भारतात मुस्लिम लोकसंख्यावाढीचे प्रमाण इतर धर्मीयांच्या तुलनेने घटत असले, तरी एकूण लोकसंख्येमधील मुस्लिमांचे प्रमाण इतरांच्या तुलनेत गेल्या

नवी दिल्ली : गेली तीन दशके भारतात मुस्लिम लोकसंख्यावाढीचे प्रमाण इतर धर्मीयांच्या तुलनेने घटत असले, तरी एकूण लोकसंख्येमधील मुस्लिमांचे प्रमाण इतरांच्या तुलनेत गेल्या १० वर्षांत अत्यल्प वाढले आहे. तसेच देशात जनगणना सुरू झाल्यापासून गेल्या ११० वर्षांत एकूण लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण प्रथमच ८० टक्क्यांच्या खाली गेले आहे.सन २०११मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेतील लोकसंख्येची जी धर्मनिहाय आकडेवारी भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर कार्यालयाने मंगळवारी जारी केली, त्यावरून हे चित्र समोर आले. ‘हम दो, उनके ग्यारह’ असे सांगत हिंदुत्ववादी संघटना देशातील मुस्लिमांची लोकसंख्या पद्धतशीरपणे वाढविण्याचे षडयंत्र राबविले जात असल्याचा प्रचार करीत असल्या तरी वस्तुस्थितीतशी नाही, हेही या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जनगणना दर १० वर्षांनी केली जाते. आकडेवारीवरून असे दिसते की, सर्वच धर्मांच्या समाजांमध्ये लोकसंख्या वाढीचे दशवार्षिक प्रमाण घटत असले तरी हिंदुंच्या तुलनेत मुस्लिमांमधील ही घट अधिक वेगाने होत आहे. गेल्या तीन दशकांमध्येही अशीच स्थिती होती. तसेच मुस्लिमांमधील जननप्रमाणही हिंदूंच्या तुलनेत अधिक प्रमाणात कमी होत असल्याचे ही आकडेवारी सांगते.असे असले तरी २००१ ते २०११ या दशकात इतर सर्व धर्मियांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण अत्यल्प घटले असले तरी फक्त मुस्लिमांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण वाढले आहे. जनगणनेच्या या ताज्या आकडेवारीनुसार,गणनेच्या १० वर्षांच्या काळात, हिंदूंचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ०.७ टक्क्यांनी, शिखांचे ०.२ टक्क्यांनी व बौद्धांचे ०.१ टक्क्याने घटले आहे. याउलट मुस्लिमांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ०.८ टक्क्याने वाढले आहे. ख्रिश्चन आणि जैन धर्मियांच्या या प्रमाणात फारसा फरक पडलेला नाही.सन २०११मध्ये देशाची एकूण लोकसंख्या १२१.०९ कोटी होती. त्यात हिंदूचे प्रमाण ७९.८ टक्के होते. गेल्या १० वर्षांत हिंदूंचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ०.७ टक्क्याने कमी झाल्याने देशात हिंदूंची टक्केवारी प्रथमच ८० टक्क्यांच्या खाली गेली आहे.याआधीही सरकार जनगणनेतील अशी धर्मनिहाय आकडेवारी जाहीर करीत असे. आता मात्र जनगणनेनंतर चार वर्षांनी व बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही आकडेवारी जाहीर करण्याच्या मोदी सरकारच्या हेतूबद्दल अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.बिहारमध्ये एकूण २४३ पैकी किमान ५० मतदारसंघांत निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पडू शकेल एवढी मुस्लिम लोकसंख्या आहे. २००१ च्या जनगणनेतील आकडेवोरीवरून मुस्लिमांची लोकसंख्या तुलनेने अधिक दराने वाढत असल्याचे चित्र समोर आल्याने मोठा वाद झाला होता. वस्तुत: तशी स्थिती नव्हती. कारण ज्या १९९१च्या जनगणनेशी तुलना केली गेली त्यावेळी फुटीरवादी कारवायांच्या अशांत वातावरणामुळे मुस्लिम बहुल जम्मू-काश्मीरमध्ये शिरगणती केली नव्हती.(लोकमत न्यूज नेटवर्क)लोकसंख्येचे धर्मनिहाय चित्रधर्म प्रमाण (टक्के)हिंदू ७९.८मुस्लीम १४.२ख्रिश्चन २.३शीख १.७बौद्ध ०.७जैन ०.४इतर ०.७धर्म न सांगणारे ०.२धर्मनिहाय लोकसंख्या वाढधर्म प्रमाण हिंदू १६.८ टक्केमुस्लिम २४.६ टक्केख्रिश्चन १५.५ टक्केशिख ८.४ टक्केबौद्ध ६.१ टक्केजौन ५.४ टक्के१७.७ टक्के दशकातील एकूण वाढ