शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

जन्मदर घटूनही देशातील मुस्लिम टक्का वाढला!

By admin | Updated: August 26, 2015 05:25 IST

गेली तीन दशके भारतात मुस्लिम लोकसंख्यावाढीचे प्रमाण इतर धर्मीयांच्या तुलनेने घटत असले, तरी एकूण लोकसंख्येमधील मुस्लिमांचे प्रमाण इतरांच्या तुलनेत गेल्या

नवी दिल्ली : गेली तीन दशके भारतात मुस्लिम लोकसंख्यावाढीचे प्रमाण इतर धर्मीयांच्या तुलनेने घटत असले, तरी एकूण लोकसंख्येमधील मुस्लिमांचे प्रमाण इतरांच्या तुलनेत गेल्या १० वर्षांत अत्यल्प वाढले आहे. तसेच देशात जनगणना सुरू झाल्यापासून गेल्या ११० वर्षांत एकूण लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण प्रथमच ८० टक्क्यांच्या खाली गेले आहे.सन २०११मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेतील लोकसंख्येची जी धर्मनिहाय आकडेवारी भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर कार्यालयाने मंगळवारी जारी केली, त्यावरून हे चित्र समोर आले. ‘हम दो, उनके ग्यारह’ असे सांगत हिंदुत्ववादी संघटना देशातील मुस्लिमांची लोकसंख्या पद्धतशीरपणे वाढविण्याचे षडयंत्र राबविले जात असल्याचा प्रचार करीत असल्या तरी वस्तुस्थितीतशी नाही, हेही या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जनगणना दर १० वर्षांनी केली जाते. आकडेवारीवरून असे दिसते की, सर्वच धर्मांच्या समाजांमध्ये लोकसंख्या वाढीचे दशवार्षिक प्रमाण घटत असले तरी हिंदुंच्या तुलनेत मुस्लिमांमधील ही घट अधिक वेगाने होत आहे. गेल्या तीन दशकांमध्येही अशीच स्थिती होती. तसेच मुस्लिमांमधील जननप्रमाणही हिंदूंच्या तुलनेत अधिक प्रमाणात कमी होत असल्याचे ही आकडेवारी सांगते.असे असले तरी २००१ ते २०११ या दशकात इतर सर्व धर्मियांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण अत्यल्प घटले असले तरी फक्त मुस्लिमांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण वाढले आहे. जनगणनेच्या या ताज्या आकडेवारीनुसार,गणनेच्या १० वर्षांच्या काळात, हिंदूंचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ०.७ टक्क्यांनी, शिखांचे ०.२ टक्क्यांनी व बौद्धांचे ०.१ टक्क्याने घटले आहे. याउलट मुस्लिमांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ०.८ टक्क्याने वाढले आहे. ख्रिश्चन आणि जैन धर्मियांच्या या प्रमाणात फारसा फरक पडलेला नाही.सन २०११मध्ये देशाची एकूण लोकसंख्या १२१.०९ कोटी होती. त्यात हिंदूचे प्रमाण ७९.८ टक्के होते. गेल्या १० वर्षांत हिंदूंचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ०.७ टक्क्याने कमी झाल्याने देशात हिंदूंची टक्केवारी प्रथमच ८० टक्क्यांच्या खाली गेली आहे.याआधीही सरकार जनगणनेतील अशी धर्मनिहाय आकडेवारी जाहीर करीत असे. आता मात्र जनगणनेनंतर चार वर्षांनी व बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही आकडेवारी जाहीर करण्याच्या मोदी सरकारच्या हेतूबद्दल अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.बिहारमध्ये एकूण २४३ पैकी किमान ५० मतदारसंघांत निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पडू शकेल एवढी मुस्लिम लोकसंख्या आहे. २००१ च्या जनगणनेतील आकडेवोरीवरून मुस्लिमांची लोकसंख्या तुलनेने अधिक दराने वाढत असल्याचे चित्र समोर आल्याने मोठा वाद झाला होता. वस्तुत: तशी स्थिती नव्हती. कारण ज्या १९९१च्या जनगणनेशी तुलना केली गेली त्यावेळी फुटीरवादी कारवायांच्या अशांत वातावरणामुळे मुस्लिम बहुल जम्मू-काश्मीरमध्ये शिरगणती केली नव्हती.(लोकमत न्यूज नेटवर्क)लोकसंख्येचे धर्मनिहाय चित्रधर्म प्रमाण (टक्के)हिंदू ७९.८मुस्लीम १४.२ख्रिश्चन २.३शीख १.७बौद्ध ०.७जैन ०.४इतर ०.७धर्म न सांगणारे ०.२धर्मनिहाय लोकसंख्या वाढधर्म प्रमाण हिंदू १६.८ टक्केमुस्लिम २४.६ टक्केख्रिश्चन १५.५ टक्केशिख ८.४ टक्केबौद्ध ६.१ टक्केजौन ५.४ टक्के१७.७ टक्के दशकातील एकूण वाढ