शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

मुस्लिम समाज राजकीय आधाराच्या शोधात; भाजपाविषयी नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 05:29 IST

राजस्थानात निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून राजकीय नेत्यांची शाब्दिक जुगलबंदी सुरु आहे.

- सुहास शेलारजयपूर : राजस्थानात निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून राजकीय नेत्यांची शाब्दिक जुगलबंदी सुरु आहे. जाती, धर्माच्या मुद्यांवरून रणकंदन सुरु आहे. काँग्रेस-भाजपाचे बडे नेते प्रचार सभांमधून एकमेकांना धर्माच्या (हिंदुत्वाच्या) व्याख्या शिकवत आहेत. मात्र, या सगळ्यात मुस्लिम समाजाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावरून मुस्लिमांचे प्रश्न, त्यांच्या समस्या मांडल्या गेल्या नाहीत किंवा त्यांच्यासाठी कोणतेही ठोस आश्वासन दिले गेले नाही. त्यामुळे मतदान कोणाला करावे आणि कोणत्या आधारावर करावे, हा प्रश्न राजस्थानातील मुस्लिमांपुढे आहे.राजस्थानात अल्पसंख्यांक समुदाय सुरुवातीपासूनच भाजपाच्या विरोधात होता. त्याचे पडसाद भाजपाच्या उमेदवारी यादीत नेहमीच दिसत आहेत. यंदा भाजपाने शेवटच्या क्षणाला एकमेव मुस्लीम उमेदवार मैदानात उतरवला. तोही काँग्रेसच्या सचिन पायलट यांच्या मार्गात अडथळा निर्माण करण्यासाठी. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केवळ मुस्लीमबहुल मतदारसंघात प्रचार करताना गोहत्या, प्रखर हिंदुत्व, लव-जिहाद यांसारख्या मुद्द्यांवरून मुस्लीम विरोधी जनभावना निर्माण केली. मतांचे ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न उघड होता. त्यामुळे मुस्लीम समाजाची भाजपावरील नाराजी कायम आहे.काँग्रेसनेही राजस्थानात मुस्लीम समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. राहुल गांधी यांनी सुरुवातीला अजमेरच्या मोईनुद्दिन चिस्तीच्या दर्ग्याला भेट दिली, तिथे चादर चढवली, अलवर येथील दर्ग्याचेही त्यांनी दर्शन घेतले. मात्र राम मंदिरावरून हिंदू समाज आक्रमक होत असताना, मुस्लिमांच्या फार जवळ जाऊन हिंदुंचा रोष ओढवून घेणे परवडणारे नाही, हे ओळखून त्यांनीही हिंदुत्वाचे वस्त्र पांघरले. तब्बल ८८.४९ टक्के हिंदु लोकसंख्या असलेल्या राजस्थानात केवळ ९.०७ टक्के मुस्लीम आहेत (आकडेवारी २०११ च्या जनगणनेनुसार); आणि मुस्लिमांच्या मतांच्या आधारे सत्ता गाठणे अशक्यप्राय आहे. त्याचाही हा परिणाम असावा.राजस्थानात सत्तेचे मुख्य दावेदार असलेले दोन्ही पक्ष आपल्या पाठीशी नसलेले पाहून मुस्लीम समाज अस्वस्थ आहे. मुस्लिमांचा प्रभाव असलेल्या प्रभागांत काँग्रेसने १५ उमेदवार उभे केले आहे. मात्र, त्यांच्यापैकी कितीजण निवडून येतात हे पाहणे गरजेचे आहे. कारण त्यांच्याविरोधात अपक्ष आणि स्थानिक पक्षांचे मिळून ३८२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी १२५ उमेदवार मुस्लीम आहेत. परिणामी मुस्लीम मतांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होऊन तेथे हिंदू उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त असल्याचे अंदाज मांडले जात आहेत.>...तर, दुसरा सर्जिकल स्ट्राईक करूपाकिस्तानी दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मुहम्मह’चा म्होरक्या मसूद अजहर याने राम मंदिरप्रश्नी दिलेल्या धमकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले. राजस्थानातील विजयनगर येथे सभेत ते म्हणाले की, मसूद अजहरने असे काही दृष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासह संपूर्ण पाकिस्तानातील दहशतवाद्यांना संपवण्यासाठी आम्ही दुसरा सर्जिकल स्ट्राइक करू’. मसूद अजहरच्या धमकीमुळे भाजपा व योगी आदित्यनाथ यांना राम मंदिरांचा मुद्दा पुन्हा प्रचारात आणणे सोपेच झाले.

टॅग्स :Muslimमुस्लीम