शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लालकृष्ण अडवाणींसह जोशीही अयोध्येला; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 21:35 IST

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तब्बल ११ हजार व्हीआयपींना बोलावण्यात आले आहे

नवी दिल्ली - अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होत आहे. अवघ्या काही दिवसांत गेल्या ३० वर्षांपासूनचे पाहिलेले रामभक्तांचे स्वप्न सत्यात उतरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते रामललाची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईल. त्यासाठी, देशभरातील अनेक मान्यवरांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. जगभरातून भारतीयांचा राम मंदिर सोहळ्यासाठी उत्साह पाहायला मिळत आहे. तर, मंदिर उभारणीसाठीच्या यात्रेत, कारसेवेत सहभागी असलेल्यांसाठी हा भावूक क्षण आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही सोहळ्याचं निमंत्रण गेलं असून तेही उपस्थित राहणार आहेत. 

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तब्बल ११ हजार व्हीआयपींना बोलावण्यात आले आहे. त्यामध्ये, राजकीय नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी, क्रिकेटर्सं आणि कारसेवकांचा समावेश आहे. आता, सरसंघचालक मोहन भागवत यांनाही विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. तर, राम मंदिर उभारणीच्या लढ्यातील खंदे कार्यकर्ते असलेल्या लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हेही सोहळ्यासाठी अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही नेत्यांसाठी विषेश व्यवस्था करण्यात येणार असून त्यांच्या सुरक्षेसाठीही विशेष यंत्रणा तैनात असणार आहे. 

या दोन्ही दिग्गज नेत्यांना यापूर्वीच निमंत्रण पत्र पाठवण्यात आले होते. मात्र, बुधवारी विश्व हिंदू परिषदेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना सोहळ्याचे निमंत्रण दिले. यावेळी, दोन्ही नेत्यांनी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं. यापूर्वी काही नेत्यांच्या विधानामुळे राम मंदिर उभारणीच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका निभावणारे हे दोन्ही नेते सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा होती. प्रकृती अस्वास्थेचं कारण देत ही अनुपस्थिती सांगण्यात येत होती. मात्र, विहिंपच्या नेत्यांनी आता फोटो शेअर करत दोन्ही नेते अयोध्येत उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले.  

सरसंघचालक मोहन भागवत यांनाही निमंत्रण

राम मंदिर बांधकाम समितीचे प्रमुख न्रीपेंद्र मिश्रा आणि विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी नागपूर येथे जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट घेतली. यावेळी, त्यांनी सरसंघचालकांना निमंत्रण पत्रिका देत, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. त्यामुळे, आता सरसंघचालकही राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्याचं काम अंतिम टप्प्यात असून काँग्रेसने या सोहळ्याचं निमंत्रण नाकारलं आहे. त्यावरुन, भाजपा नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीBJPभाजपा