शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

ही तर लोकशाहीची हत्या, चिदंबरम यांच्या अटकेवर काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 11:10 IST

आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना करण्यात आलेल्या अटकेविरोधात काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना करण्यात आलेल्या अटकेविरोधात काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चिदंबरम यांना करण्यात आलेली अटक ही लोकशाहीची हत्या असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. दरम्यान, काल रात्री अटक करण्यात आलेल्या चिदंबरम यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पी. चिदंबरम यांना करण्यात आलेल्या अटकेविरोधात काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, '' गेल्या दोन दिवसांमध्ये देशाने प्रसारमाध्यमांमधून लोकशाहीची दिवसाढवळ्या आणि कधीकधी रात्री हत्या झाल्याचे पाहिले आहे. सध्याच्या भाजपा सरकारने ईडी आणि सीबीआयला वैयक्तिक बदला घेणाऱ्या संस्थांमध्ये परिवर्तित करून टाकले आहे. पूर्वग्रह आणि वैयक्तिक बदला घेण्याच्या भावनेतून चिदंबरम यांना ज्याप्रकारे अटक करण्यात आली त्यावरून  मोदी सरकार वैयक्तिक बदला घेण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते, हे सिद्ध झाले.'' सरकारला अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा दावाही काँग्रेसने केला. ''आज भाजपाचे सरकार देशाला भयंकर मंदीच्या लाटेतून बाहेर काढण्यासाठी उपाययोजन करण्यात अपयशी ठरले आहे. लोक लाखोंच्या संख्येने रोजगार गमावत आहेत. रुपयाचे मूल्य घसरले आहे. प्रत्येक क्षेत्राला मंदीची झळ बसत आहे. या प्रश्नांवरून देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या दोन दिवसांमध्ये चिदंबरम यांच्या अटकेचे नाटक रंगवले आहे.  

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेसPoliticsराजकारण