शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

मुरादपूरचं होणार मुरलीपूर, इस्लामनगरचं ईश्वरनगर! या राज्यात एकाच जिल्ह्यातील ५४ गावांची नावं बदलणार    

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:31 IST

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गावांची नावं बदलण्याचा धडाका लावला असून, आता राज्यातील देवास जिल्ह्यातील ५४ गावांची नावं बदलण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलण्याची सुरू केलेली परंपरा आता मध्य प्रदेश सरकारनेही अंगीकारली आहे. मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गावांची नावं बदलण्याचा धडाका लावला असून, आता राज्यातील देवास जिल्ह्यातील ५४ गावांची नावं बदलण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

देवास जिल्ह्यातील पीपलरांवा गावात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री मोहन यादव यांना भाजपा जिल्हाध्यक्षांनी गावांची नावं बदलण्याबाबत एक यादी सोपवली. तसेच या गावांची नावं बदलण्यात यावी, अशी जनभावना असल्याचे सांगितले.

त्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मंचावरूनच जिल्हाध्यक्ष रायसिंह सैंधव यांचा प्रस्ताव स्वीकारला. तसेच या ५४ गावांची नावं बदलण्याची घोषणा केली. तसेच या गावांची नावं बदलण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आता प्रशासकीय पातळीवर या गावांची नावं बदलली जातील.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मंचावरूनच गावांची नावं बदलण्याची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री शाजापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मंचावरूनच ११ गावांची नावं बदलण्याची घोषणा केली होती.

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून ज्या गावांची नावं उर्दू-अरबी भाषेत आहेत, अशा गावांची नावं बदलली जात आहेत. देवास जिल्ह्यामधील ज्या ५४ गावांची नावं बदलण्याची विनंती जिल्हाध्यक्षांनी केली होती त्या गावांमधील काही गावांची नावं मुरादपूर, हैदरपूर, शमशाबाद आमि इस्लामनगर अशी आहेत. मुख्यमंत्र्यांना जिल्हाध्यक्षांना या गावांच्या सध्याच्या नावांसोबत नव्या नावांची यादीही सोपवली आहे. त्यात मुरादपूरचं मुरलीपूर, हैदरपूरचं हीरापूर, शमशाबादचं श्यामपूर,  इस्माइल खेडी गावाचं ईश्वरपूर, अलीपूरचं रामपूर, नबीपूरचं नयापूर आणि मिर्झापूरचं मीरापूर असं नामकरण सूचवण्यात आलं आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा