शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

घसरलेल्या मालगाडीला धडकली मुंबई-हावडा; २ प्रवाशांचा मृत्यू, १८ डबे रुळांवरून घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 05:43 IST

अपघात घडला त्यावेळी मेलचा वेग ताशी १२० किलाेमीटर हाेता. त्या सहा मिनिटांमध्ये पावले उचलण्यात आली असती, तर हा अपघात टळला असता.

जमशेदपूर : पहाटेच्या साखरझाेपेत असलेल्या रेल्वे प्रवाशांवर काळाने घाला घातला. हावड्याहून मुंबईला येणाऱ्या १२८१० हावडा-मुंबई मेलचे १८ डबे बडाबम्बू रेल्वेस्थानकाजवळ घसरले. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, २० जण जखमी झाले आहेत. त्यांपैकी सहाजणांची प्रकृती गंभीर आहे. 

पहाटे ३:४३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याच ठिकाणी एक मालगाडीदेखील रुळांवरून घसरली हाेती. मेलचे इंजिन मालगाडीला धडकल्यामुळे मेलचे डबे घसरले. जमशेदपूरपासून सुमारे ९० किलाेमीटर अंतरावर अपघाताचे ठिकाण आहे. अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १० लाख तर गंभीर जखमींना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  

ताशी १२० किमी वेग

हावड्याच्या दिशेने जाणाऱ्या रुळांवर एक मालगाडी घसरली हाेती. तिला मेलचे डबे धडकले. अपघात घडला त्यावेळी मेलचा वेग ताशी १२० किलाेमीटर हाेता. गाडी वेगाने असल्यामुळे जवळपास एक किलाेमीटर अंतरावरील रुळ उखडून गेले. 

हलगर्जीपणा भाेवला?

३.३३ वाजता मालगाडीने बडाबम्बू स्थानक ओलांडले आणि २ किलाेमीटर अंतरावर ३.३९ वाजता मालगाडीचे काही डबे घसरले. याबाबत लाेकाेपायलटने नियंत्रण कक्षाला सूचना दिली. त्यानंतर ३.४५ वाजताच्या सुमारस वेगाने धावणारी मेल मालगाडीला धडकली. या सहा मिनिटांमध्ये पावले उचलण्यात आली असती, तर हा अपघात टळला असता.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात