शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

घसरलेल्या मालगाडीला धडकली मुंबई-हावडा; २ प्रवाशांचा मृत्यू, १८ डबे रुळांवरून घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 05:43 IST

अपघात घडला त्यावेळी मेलचा वेग ताशी १२० किलाेमीटर हाेता. त्या सहा मिनिटांमध्ये पावले उचलण्यात आली असती, तर हा अपघात टळला असता.

जमशेदपूर : पहाटेच्या साखरझाेपेत असलेल्या रेल्वे प्रवाशांवर काळाने घाला घातला. हावड्याहून मुंबईला येणाऱ्या १२८१० हावडा-मुंबई मेलचे १८ डबे बडाबम्बू रेल्वेस्थानकाजवळ घसरले. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, २० जण जखमी झाले आहेत. त्यांपैकी सहाजणांची प्रकृती गंभीर आहे. 

पहाटे ३:४३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याच ठिकाणी एक मालगाडीदेखील रुळांवरून घसरली हाेती. मेलचे इंजिन मालगाडीला धडकल्यामुळे मेलचे डबे घसरले. जमशेदपूरपासून सुमारे ९० किलाेमीटर अंतरावर अपघाताचे ठिकाण आहे. अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १० लाख तर गंभीर जखमींना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  

ताशी १२० किमी वेग

हावड्याच्या दिशेने जाणाऱ्या रुळांवर एक मालगाडी घसरली हाेती. तिला मेलचे डबे धडकले. अपघात घडला त्यावेळी मेलचा वेग ताशी १२० किलाेमीटर हाेता. गाडी वेगाने असल्यामुळे जवळपास एक किलाेमीटर अंतरावरील रुळ उखडून गेले. 

हलगर्जीपणा भाेवला?

३.३३ वाजता मालगाडीने बडाबम्बू स्थानक ओलांडले आणि २ किलाेमीटर अंतरावर ३.३९ वाजता मालगाडीचे काही डबे घसरले. याबाबत लाेकाेपायलटने नियंत्रण कक्षाला सूचना दिली. त्यानंतर ३.४५ वाजताच्या सुमारस वेगाने धावणारी मेल मालगाडीला धडकली. या सहा मिनिटांमध्ये पावले उचलण्यात आली असती, तर हा अपघात टळला असता.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात