शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मृत्यूचा थरार! 153 विमान प्रवाशी, 5 मिनिटे पुरेल इतका इंधनसाठा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 10:52 IST

चांगले हवामान आणि लखनऊ विमान वाहतूक नियंत्रण कक्षाच्या प्रसंगावधनामुळे या विमानाचा मोठा अपघात टळला

लखनऊ -  मुंबई ते दिल्ली जाणाऱ्या विस्तारा विमानातील इंधन संपुष्टात आल्याने 153 प्रवाशांचे जीव टांगणीला लागले होते. जवळपास 4 तास हे विमान हवेत उड्डाण घेत असल्याने इंधन टाकीत फक्त पाच मिनिटं पुरेल इतकं इंधन असल्याने या विमानाचा मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मुंबईहूनदिल्लीला जाणारं हे विमान पहिल्यांदा लखनऊ येथे वळविण्यात आलं. त्यानंतर या विमानाला प्रयागराजला पाठविण्यात आलं. लखनऊवरुन प्रयागराजला गेल्यानंतर पुन्हा विमानाला लखनऊला बोलविण्यात आलं. अंधूक प्रकाशामुळे विमानाच्या लँडिंगला अडचण निर्माण झाली होती. अखेर पायलटने इमरजेन्सी संदेश पाठवल्यानंतर विमानाला लखनऊ येथील विमानतळावर उतरविण्यात आलं त्यावेळी विमानातील इंधन जवळपास संपलेले होतं. 

चांगले हवामान आणि लखनऊ विमान वाहतूक नियंत्रण कक्षाच्या प्रसंगावधनामुळे या विमानाचा मोठा अपघात टळला. लखनऊ ते प्रयागराज येथील बमरौली विमानतळ जवळपास 200 किमी अंतरावर आहे. हे अंतर पार करण्यासाठी विमानात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध नव्हता. प्रयागराजच्या मार्गावर सात किमी गेल्यानंतर या विमानाला पुन्हा लखनऊला बोलविण्यात आलं. जेथे 20 मिनिटांच्या कालावधीत या विमानाचं लँडिंग करण्यात आलं. 

 

विमानाला पुन्हा लखनऊला आणण्याबाबत पायलटला विमान वाहतूक नियंत्रण कक्षाने कळविलं. लखनऊ येथील वातावरण चांगले झाले असून विमान लखनऊला उतरवू शकता. त्यानंतर पायलटने विमान लखनऊला वळविले. जेव्हा विमानाचं लखनऊला लँडिंग झालं तेव्हा विमानात 200 किलोग्रॅम म्हणजे 5 मिनिटे उड्डाण होईल इतकं इंधन शिल्लक होतं. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ए 320 UK 944  हे विमान मुंबईहून दुपारी 2.40 वाजता 8, 500 किलो इंधनासह दिल्लीसाठी रवाना झाली. मुंबई ते दिल्ली यातील विमान प्रवासाचं अंतर दोन तासाचं आहे. या प्रकरणावर विमान प्राधिकरणाने चौकशीचे आदेश दिले आहेत. एका ज्येष्ठ पायलटने या घटनेवर सांगितले की, हा एक चमत्कार आहे विमान लँडिंग होणं. विमानातील इंधनसाठा कमी असताना लखनऊवरुन विमान पुन्हा प्रयागराज वळविण्यात आलं ही भयंकर मोठी चूक आहे. दिल्लीत खराब वातावरण आणि अंधूक प्रकाशामुळे जवळपास 75 मिनिटं हे विमान हवेत घिरक्या घेत होतं. त्यानंतर पायलटने लखनऊ विमानतळावर विमान वळविण्याचा निर्णय घेतला होता.  

टॅग्स :Mumbaiमुंबईdelhiदिल्ली