शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

Mulayam Singh Yadav Death: देवेगौडा नाही, मुलायम सिंहच पंतप्रधान होणार होते, तयारीही झालेली, पण... दोनदा संधी हुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 13:03 IST

सरकार स्थापन करण्यासाठी तेव्हाचे मोठे नेते किशन सिंह सुरजित यांना जबाबदारी देण्यात आली. त्यांनी मुलायम सिंहांच्या नावाचा आग्रह धरला.

मुलायम सिंह यादव यांना राजकारणाच्या आखाड्यातील पैलवान म्हटले जायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आज आपल्या भाषणाची सात मिनिटे मुलायम सिहांची स्तुती केली. युपीचे तीन वेळा मुख्यमंत्री ते केंद्रात संरक्षण मंत्री झालेल्या या मुलायम सिंहांची पंतप्रधान न होण्याची गोष्ट देखील खूप महत्वाची आहे. 

मुलायम सिंह यादव एकदा नाही दोनदा पंतप्रधान होता होता राहिले होते. मुलायम सिंहांनी भर सभेत त्यांच्या पंतप्रधान न होण्यामागच्या ' चार शुक्राचार्यांची' नावे घेतली होती. देवेगौडा पंतप्रधान झाले, परंतू त्यांच्या जागी मुलायम सिंहांचे नाव चर्चेत होते. १९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला होता. काँग्रेसच्या १४१ जागा आणि भाजपाच्या १६१ जागा आल्या होता. तेव्हा अटल बिहारी वायपेयी यांना सरकार बनविण्याचे निमंत्रण मिळाले. वाजपेयींचे सरकार १३ दिवसांतच पडले. 

आता काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी होती. मात्र, त्यांना सर्व पक्षांना एकत्र घेऊन खिचडी सरकार बनवायचे नव्हते. व्ही पी सिंह यांनी देखील पंतप्रधान बनण्यास नकार दिला. मात्र, याचवेळी त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ज्योती बसू यांना पीएम बनविण्यासाठी नाव पुढे केले. या नावावर पोलिट ब्युरोने फुली मारली. आता उरले लालूप्रसाद यादव आणि मुलायम सिंह यादव. त्यात लालू यांचे नाव चारा घोटाळ्यात बदनाम होऊ लागले होते. यामुळे लालू रेसमधून बाहेर पडले. सरकार स्थापन करण्यासाठी तेव्हाचे मोठे नेते किशन सिंह सुरजित यांना जबाबदारी देण्यात आली. त्यांनी मुलायम सिंहांच्या नावाचा आग्रह धरला. मुलायम सिंह पीएम होणार हे पक्के झाले, शपथ समारंभाची तशी तयारीही करण्यात आली. पण लालू यादव आणि शरद यादव यांनी त्यास विरोध दर्शविला. यामुळे नंतर एचडी देवेगौडांचा नंबर लागला.

देवेगौडांचे सरकारही काही महिन्यांनी पडले. १९९९ मध्ये पुन्हा निवडणुका लागल्या. मुलायम सिंह संभल आणि कन्नौजच्या जागांवर जिंकले होते. पंतप्रधान पदासाठी पुन्हा त्यांचे नाव आले. तेव्हाही यादव नेत्यांनी यास विरोध केला. तेव्हाही लालू प्रसाद पुढे होते. ही दुसरी संधी निघून गेली. मुलायम यांनी एका सभेत लालू प्रसाद यादव, शरद यादव, चंद्रा बाबू नायडू आणि व्ही पी सिंहांचे नाव घेत यांच्यामुळेच मी पंतप्रधान बनलो नाही, असे सांगितले होते. 

मुलायमसिंग यादव 1989 ते 1991, 1993 ते 1995 आणि 2003 ते 2007 असे तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 1996 ते 1998 या काळात ते देशाचे संरक्षण मंत्री होते. मुलायम सिंहांना गृह मंत्री पद हवे होते. परंतू, त्यांना संरक्षण मंत्री पद देण्यात आले. त्याचेही त्यांनी सोने केले. 

टॅग्स :Mulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवprime ministerपंतप्रधान