शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

अकबर आणि महान सम्राट..., छे छे, काहीतरीच काय?; महाराणा प्रताप हेच श्रेष्ठ- योगी आदित्यनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 08:54 IST

सध्या काही लोक वैयक्तिक स्वार्थापायी स्वत:चा समाज, संस्कृती आणि देशातील वातावरण गढूळ करायचा प्रयत्न करत आहेत.

लखनऊ: अकबराला महान सम्राट वैगैरे म्हणणे ही अतिशयोक्ती ठरेल. महाराणा प्रताप हेच 16 व्या शतकातील महान सम्राट होते, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ते गुरुवारी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महाराणा प्रताप यांची प्रशंसा करताना म्हटले की, 1576 साली हळदीघाट येथील लढाईत कोण जिंकले किंवा हरले, हे महत्त्वाचे नाही. याउलट स्वाभिमानी महाराणा प्रताप यांनी अरवलीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक वर्षे अकबराच्या सैन्याशी लढा दिला. चिकाटीने लढून सर्व किल्ले परत मिळवले. तुम्ही माझे सम्राटपद मान्य करा, मी कधीच मेवाडमध्ये फिरकणार नाही, असा प्रस्ताव अकबराने महाराणा प्रतापांसमोर ठेवला होता. जयपूरच्या महाराज मानसिंग यांनीदेखील त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाराणा प्रतापांनी अकबराचे सम्राटपद कधीच मान्य केले नाही. मी तुर्कांवर कधीच विश्वास ठेवणार नाही, असे त्यांनी अकबराला ठणकावून सांगितल्याचा इतिहास योगींनी उपस्थितांसमोर मांडला. त्याकाळी अनेक राजांनी आपला स्वाभिमान गहाण टाकून अकबराचे सम्राटपद मान्य केले. मात्र, महाराणा प्रताप त्याला अपवाद ठरले. त्यांचे हे विचार आजच्या काळातही लागू पडतात. सध्या काही लोक वैयक्तिक स्वार्थापायी स्वत:चा समाज, संस्कृती आणि देशातील वातावरण गढूळ करायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्वांचे नुकसान होत आहे. यावेळी योगी आदित्यनाथांनी अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांना आवाहन केले की, तुम्ही स्वत:ला महाराणा प्रतापांचे वंशज समजा. याच सर्व लोकांच्या पाठिंब्यामुळे महाराणा प्रताप इतके महान राजे ठरले. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्येही त्यांनी अकबराच्या सैन्याशी लढा दिला आणि ते शेवटपर्यंत शत्रूच्या हाताला लागले नाहीत, असे योगींनी सांगितले. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ