शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Mrityu Kup: संभलमध्ये खोदकामावेळी आढळला मृत्यू कूप; काय आहे धार्मिक महत्त्व?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 18:28 IST

Mrityu Kup in Sambhal : हनुमान मंदिर आणि शिव मंदिर आढळून आल्यानंतर संभलमध्ये खोदकाम सुरू असून, जमिनीखाली गाडल्या गेलेली अनेक जुनी मंदिर आणि धार्मिक अवशेष आढळून येत आहे. 

Sambhal Latest News: गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील संभल बातम्या आणि चर्चेचा विषय ठरत आहे. संभलमध्ये सुरू असलेल्या खोदकामात मंदिरं, जुन्या विहिरी आढळून आल्या आहेत. गुरुवारी संभलमध्ये मृत्यू कूप सापडला. तिथे बाजूला शिव मंदिर असल्याचा दावाही करण्यात आला आहे. प्रशासनाने या मृत्यू कूप खोदण्यास आणि जिर्णोद्धाराचे काम सुरू केले आहे. 

शाही जामा मशीद सर्व्हेक्षण मुद्द्यावरून संभल चर्चेमध्ये आले. त्यानंतर प्रशासनाने येथे पाहणी आणि खोदकाम सुरू केले आहे. आतापर्यंत काही मंदिरं, विहिरी आणि बारव सापडले आहेत. गुरूवारी प्रशासनाला एक कूप सापडला. हा मृत्यू कूप असल्याचे सांगण्यात आले. 

उत्तर प्रदेशातील संभल प्राचीन काळात तीर्थांचे केंद्र होते. याचा पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहे. पौराणिक कथांनुसार, संभलमध्ये ८४ कोसी नदी परिक्रमा मार्ग, ६८ तीर्थ आणि १९ कूप अस्तित्वात होते. त्याचे धार्मिक महत्त्व होते. 

बदलत्या काळात येथून हिंदूंचे स्थलांतर होत गेले. त्यामुळे मंदिरं ओसाड पडली आणि विहिरी बारव मातीने बुजली गेली. आजघडीला संभलमध्ये ३ तीर्थ अस्तित्वात आहेत, ज्याची परिक्रमा आणि दर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक येतात. अशा पौराणिक कथा आहेत की, पंच कोसी यात्रा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

मृत्यू कूपचे धार्मिक महत्त्व काय?

संभलमधील मृत्यू कूपबद्दल काही पौराणिक कथा आहे. या कथांमध्ये असे म्हटले गेले आहे की, येथे स्नान केल्याने मोक्ष मिळतो. या भागाचे नगरसेवक गगन वाष्णेय यांनी सांगितले की, 'आज संभलमध्ये ऐतिहासिक मृत्यू कूपचे खोदकाम सुरू झाले आहे. हा प्राचीन कूप आहे. हे खोदकाम नगरपालिकेच्या मदतीने सुरू आहे. धार्मिक मान्यता अशी आहे की, इथे स्नान केल्याने माणसाला मोक्ष प्राप्त होतो.' 

संभलमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या तीन तीर्थ कोणती?

संभलपासून तीन ते चार किमी अंतरावर वंशगोपाल मंदिर आहे आहे. ते बेनीपूर कमलपूर गावात आहे. हे मंदिर श्रीकृष्णाचे असून, प्राचीन काळापासून पंचक्रोशी परिक्रमा या मंदिरापासून सुरू होते. या परिक्रमेत संभलशिवाय इतर ठिकाणचे लोकही सहभागी होतात. इथे पूजा केल्याने अपत्य प्राप्ती होते, असे म्हणतात. 

तीन तीर्थांपैकीच दुसरे आहे सूर्यकुंड तीर्थ. याला अर्ककुंड तीर्थ म्हणून ओळखले जाते. २४ कोसी परिक्रमा करण्यासाठी लोक येतात. दिवाळीनंतर दोन दिवसांनी ही परिक्रमा सुरू होते. येथे यात्राही भरते. येथे स्नान केल्याने पाप धुतले जातात, अशी पौराणिक मान्यता आहे.

मृत्युजंय तीर्थ हे संभलमधील हयातनगरमध्ये आहे. इथे पूजा, स्नान केल्यानं अकाली मृत्यू होत नाही, असे म्हणतात. त्याचबरोबर येथे स्नान करणाऱ्यांना लोकांना मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळते, अशाही कथा आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशReligious Placesधार्मिक स्थळेArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणhistoryइतिहास