शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Mrityu Kup: संभलमध्ये खोदकामावेळी आढळला मृत्यू कूप; काय आहे धार्मिक महत्त्व?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 18:28 IST

Mrityu Kup in Sambhal : हनुमान मंदिर आणि शिव मंदिर आढळून आल्यानंतर संभलमध्ये खोदकाम सुरू असून, जमिनीखाली गाडल्या गेलेली अनेक जुनी मंदिर आणि धार्मिक अवशेष आढळून येत आहे. 

Sambhal Latest News: गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील संभल बातम्या आणि चर्चेचा विषय ठरत आहे. संभलमध्ये सुरू असलेल्या खोदकामात मंदिरं, जुन्या विहिरी आढळून आल्या आहेत. गुरुवारी संभलमध्ये मृत्यू कूप सापडला. तिथे बाजूला शिव मंदिर असल्याचा दावाही करण्यात आला आहे. प्रशासनाने या मृत्यू कूप खोदण्यास आणि जिर्णोद्धाराचे काम सुरू केले आहे. 

शाही जामा मशीद सर्व्हेक्षण मुद्द्यावरून संभल चर्चेमध्ये आले. त्यानंतर प्रशासनाने येथे पाहणी आणि खोदकाम सुरू केले आहे. आतापर्यंत काही मंदिरं, विहिरी आणि बारव सापडले आहेत. गुरूवारी प्रशासनाला एक कूप सापडला. हा मृत्यू कूप असल्याचे सांगण्यात आले. 

उत्तर प्रदेशातील संभल प्राचीन काळात तीर्थांचे केंद्र होते. याचा पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहे. पौराणिक कथांनुसार, संभलमध्ये ८४ कोसी नदी परिक्रमा मार्ग, ६८ तीर्थ आणि १९ कूप अस्तित्वात होते. त्याचे धार्मिक महत्त्व होते. 

बदलत्या काळात येथून हिंदूंचे स्थलांतर होत गेले. त्यामुळे मंदिरं ओसाड पडली आणि विहिरी बारव मातीने बुजली गेली. आजघडीला संभलमध्ये ३ तीर्थ अस्तित्वात आहेत, ज्याची परिक्रमा आणि दर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक येतात. अशा पौराणिक कथा आहेत की, पंच कोसी यात्रा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

मृत्यू कूपचे धार्मिक महत्त्व काय?

संभलमधील मृत्यू कूपबद्दल काही पौराणिक कथा आहे. या कथांमध्ये असे म्हटले गेले आहे की, येथे स्नान केल्याने मोक्ष मिळतो. या भागाचे नगरसेवक गगन वाष्णेय यांनी सांगितले की, 'आज संभलमध्ये ऐतिहासिक मृत्यू कूपचे खोदकाम सुरू झाले आहे. हा प्राचीन कूप आहे. हे खोदकाम नगरपालिकेच्या मदतीने सुरू आहे. धार्मिक मान्यता अशी आहे की, इथे स्नान केल्याने माणसाला मोक्ष प्राप्त होतो.' 

संभलमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या तीन तीर्थ कोणती?

संभलपासून तीन ते चार किमी अंतरावर वंशगोपाल मंदिर आहे आहे. ते बेनीपूर कमलपूर गावात आहे. हे मंदिर श्रीकृष्णाचे असून, प्राचीन काळापासून पंचक्रोशी परिक्रमा या मंदिरापासून सुरू होते. या परिक्रमेत संभलशिवाय इतर ठिकाणचे लोकही सहभागी होतात. इथे पूजा केल्याने अपत्य प्राप्ती होते, असे म्हणतात. 

तीन तीर्थांपैकीच दुसरे आहे सूर्यकुंड तीर्थ. याला अर्ककुंड तीर्थ म्हणून ओळखले जाते. २४ कोसी परिक्रमा करण्यासाठी लोक येतात. दिवाळीनंतर दोन दिवसांनी ही परिक्रमा सुरू होते. येथे यात्राही भरते. येथे स्नान केल्याने पाप धुतले जातात, अशी पौराणिक मान्यता आहे.

मृत्युजंय तीर्थ हे संभलमधील हयातनगरमध्ये आहे. इथे पूजा, स्नान केल्यानं अकाली मृत्यू होत नाही, असे म्हणतात. त्याचबरोबर येथे स्नान करणाऱ्यांना लोकांना मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळते, अशाही कथा आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशReligious Placesधार्मिक स्थळेArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणhistoryइतिहास