शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डास चावला म्हणून खासदाराने थांबवली ट्रेन; डब्ब्याच्या सफाईसाठी अधिकारी तात्काळ दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 15:57 IST

सामान्य लोकांच्या समस्या कुणी ऐकून घेत नाही, पण एखाद्या मोठ्या व्यक्तीला त्रास झाला की, सगळे तात्काळ हजर होतात.

उत्तर प्रदेशातून डास चावल्याची एक रंजक घटना समोर आली आहे. इटाहचे खासदार राजवीर सिंह लखनऊच्या चारबाग रेल्वे स्थानकावरुन दिल्लीला निघालेल्या गोमती एक्स्प्रेस (12419) ट्रेनमध्ये प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांना डास चावला. मग काय...खासदाराने तक्रार नोंदवली अन् प्रशासनात खळबळ उडाली.

घाईगडबडीत रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि गाडी थांबवून संपूर्ण बोगीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. बोगीची साफसफाई झाल्यानंतरच गाडी पुढे रवाना करण्यात आली. खासदारासोबत प्रवास करणाऱ्या मान सिंह यांनी ट्विटरवरुन तक्रार नोंदवली. खासदार राजवीर सिंह ट्रेनच्या फर्स्ट एसी डब्यात प्रवास करत आहेत. ट्रेनचे बाथरुम अस्वच्छ असून डास चावत आहेत. त्यामुळे खासदारांना बसणेही कठीण झाले आहे, अशी तक्रार त्यांनी केली.

या ट्विटनंतर अधिकारी अॅक्शन मोडमध्ये आले आणि ट्रेन उन्नाव येथे थांबवण्यात आली. यानंतर संपूर्ण डबा स्वच्छ करण्यात आला. डास गेल्यानंतर संपूर्ण बोगीवर फवारणी करण्यात आली. यानंतर उन्नाव रेल्वे स्थानकावरून ट्रेन दिल्लीला रवाना करण्यात झाली. रेल्वेच्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 

सामान्य माणसाला प्रवासादरम्यान अशा समस्यांशी सतत झगडावे लागते, तो तक्रार करत राहतो पण सामान्यांचे कुणी ऐकत नाही. पण एखाद्या नेताजीची अडचण झाली की, प्रशासन तत्काळ कारवाई करते. रेल्वेत प्रवास करताना लोक नेहमी तक्रार करतात की त्यांच्या तक्रारी ऐकून घेणारे कोणी नाही. कधी पाणीटंचाई, कधी घाण तर कधी उन्हाळ्यात पंखे खराब झाल्याच्या तक्रारी, अशा समस्यांनी प्रवासी नेहमीच त्रस्त असतात.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndian Railwayभारतीय रेल्वेMember of parliamentखासदार