शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

...अन् खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत हनुमान चालीसा म्हणून दाखवली! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 17:05 IST

श्रीकांत शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना भाजप युतीला बहुमत दिले होते. मात्र निवडणुकीनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, यांना वाटायला लागले, आपणच मुख्यमंत्री व्हावे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदूत्वाच्या विचारांना कोण विचारतं. यांनी हिंदूत्वाचे विचार विकण्याचे आणि बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर जाण्याचे काम केले.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. या प्रस्तावावर आजपासून लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेत सहभाग घेत, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर तर हल्ला चढवलाच. पण महाराष्ट्रातील राजकारणावरही भाष्य केले. यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. तसेच हिंदूत्वावर बोलताना लोकसभेतच हनुमान चालिसाही म्हणून दाखवली.  

यांनी हिंदूत्वाचे विचार विकण्याचे काम केले -श्रीकांत शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना भाजप युतीला बहुमत दिले होते. मात्र निवडणुकीनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, यांना वाटायला लागले, आपणच मुख्यमंत्री व्हावे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदूत्वाच्या विचारांना कोण विचारतं. यांनी हिंदूत्वाचे विचार विकण्याचे आणि बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर जाण्याचे काम केले. बाळासाहेब म्हणत होते, मी शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही आणि तसे झाले तर मी माझे दुकान बंद करेन. एवढेच नाही, तर निवडणुकीत आपण एकमेकांना शिव्या देता आणि निवडणुकीनंतर आघाड्या करता, जनतेसमोर कोणत्या तोंडाने जाणार? असेही बाळासाहेब म्हणत होते. यांनीही असेच केले निवडणूक एकासोबत लढली आणि निवडून आल्यानंतर खुर्चीसाठी सर्व विचार बाजूला करून अनैतिक सरकार स्थापन केले."

"येथे कधी कुणीविचार केला नव्हता, की काँग्रेस सोबत शिवसेनेची आघाडी होईल. लोकांनीही कधी हा विचार केला नव्हता. मात्र लोकांसोबत मतदारांसोबत ज्यांनी ते सरकार बनवले त्यांनी गद्दारी केली. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम केले. ज्यांनी कारसेवकांवर गोळ्या चालवल्या त्या समाजवादी सोबतही यांनी आघाडी केली," अशी टीकाही शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठकरेंवर केली.

हणूमान चालिसा म्हणण्यावरही महाराष्ट्रात बंदी होती -श्रीकांत शिंदे म्हणाले, "हणूमान चालिसा म्हणण्यावरही महाराष्ट्रात बंदी होती. मला संपूर्ण हणूमान चालिसा येते, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी थेट लोकसभेतच हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली. तसेच, आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर आणि हिंदूत्वार चालणारे लोक आहोत. ज्यांना हनुमान चालिसा म्हणायची होती त्यांना कारागृहात टाकण्यात आले आणि त्यांच्यावर देश द्रोहाचा आरोप लावण्यात आला होता, असेही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले."

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनShrikant Shindeश्रीकांत शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना