शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

...अन् खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत हनुमान चालीसा म्हणून दाखवली! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 17:05 IST

श्रीकांत शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना भाजप युतीला बहुमत दिले होते. मात्र निवडणुकीनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, यांना वाटायला लागले, आपणच मुख्यमंत्री व्हावे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदूत्वाच्या विचारांना कोण विचारतं. यांनी हिंदूत्वाचे विचार विकण्याचे आणि बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर जाण्याचे काम केले.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. या प्रस्तावावर आजपासून लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेत सहभाग घेत, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर तर हल्ला चढवलाच. पण महाराष्ट्रातील राजकारणावरही भाष्य केले. यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. तसेच हिंदूत्वावर बोलताना लोकसभेतच हनुमान चालिसाही म्हणून दाखवली.  

यांनी हिंदूत्वाचे विचार विकण्याचे काम केले -श्रीकांत शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना भाजप युतीला बहुमत दिले होते. मात्र निवडणुकीनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, यांना वाटायला लागले, आपणच मुख्यमंत्री व्हावे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदूत्वाच्या विचारांना कोण विचारतं. यांनी हिंदूत्वाचे विचार विकण्याचे आणि बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर जाण्याचे काम केले. बाळासाहेब म्हणत होते, मी शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही आणि तसे झाले तर मी माझे दुकान बंद करेन. एवढेच नाही, तर निवडणुकीत आपण एकमेकांना शिव्या देता आणि निवडणुकीनंतर आघाड्या करता, जनतेसमोर कोणत्या तोंडाने जाणार? असेही बाळासाहेब म्हणत होते. यांनीही असेच केले निवडणूक एकासोबत लढली आणि निवडून आल्यानंतर खुर्चीसाठी सर्व विचार बाजूला करून अनैतिक सरकार स्थापन केले."

"येथे कधी कुणीविचार केला नव्हता, की काँग्रेस सोबत शिवसेनेची आघाडी होईल. लोकांनीही कधी हा विचार केला नव्हता. मात्र लोकांसोबत मतदारांसोबत ज्यांनी ते सरकार बनवले त्यांनी गद्दारी केली. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम केले. ज्यांनी कारसेवकांवर गोळ्या चालवल्या त्या समाजवादी सोबतही यांनी आघाडी केली," अशी टीकाही शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठकरेंवर केली.

हणूमान चालिसा म्हणण्यावरही महाराष्ट्रात बंदी होती -श्रीकांत शिंदे म्हणाले, "हणूमान चालिसा म्हणण्यावरही महाराष्ट्रात बंदी होती. मला संपूर्ण हणूमान चालिसा येते, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी थेट लोकसभेतच हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली. तसेच, आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर आणि हिंदूत्वार चालणारे लोक आहोत. ज्यांना हनुमान चालिसा म्हणायची होती त्यांना कारागृहात टाकण्यात आले आणि त्यांच्यावर देश द्रोहाचा आरोप लावण्यात आला होता, असेही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले."

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनShrikant Shindeश्रीकांत शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना