शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...अन् खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत हनुमान चालीसा म्हणून दाखवली! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 17:05 IST

श्रीकांत शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना भाजप युतीला बहुमत दिले होते. मात्र निवडणुकीनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, यांना वाटायला लागले, आपणच मुख्यमंत्री व्हावे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदूत्वाच्या विचारांना कोण विचारतं. यांनी हिंदूत्वाचे विचार विकण्याचे आणि बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर जाण्याचे काम केले.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. या प्रस्तावावर आजपासून लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेत सहभाग घेत, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर तर हल्ला चढवलाच. पण महाराष्ट्रातील राजकारणावरही भाष्य केले. यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. तसेच हिंदूत्वावर बोलताना लोकसभेतच हनुमान चालिसाही म्हणून दाखवली.  

यांनी हिंदूत्वाचे विचार विकण्याचे काम केले -श्रीकांत शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना भाजप युतीला बहुमत दिले होते. मात्र निवडणुकीनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, यांना वाटायला लागले, आपणच मुख्यमंत्री व्हावे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदूत्वाच्या विचारांना कोण विचारतं. यांनी हिंदूत्वाचे विचार विकण्याचे आणि बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर जाण्याचे काम केले. बाळासाहेब म्हणत होते, मी शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही आणि तसे झाले तर मी माझे दुकान बंद करेन. एवढेच नाही, तर निवडणुकीत आपण एकमेकांना शिव्या देता आणि निवडणुकीनंतर आघाड्या करता, जनतेसमोर कोणत्या तोंडाने जाणार? असेही बाळासाहेब म्हणत होते. यांनीही असेच केले निवडणूक एकासोबत लढली आणि निवडून आल्यानंतर खुर्चीसाठी सर्व विचार बाजूला करून अनैतिक सरकार स्थापन केले."

"येथे कधी कुणीविचार केला नव्हता, की काँग्रेस सोबत शिवसेनेची आघाडी होईल. लोकांनीही कधी हा विचार केला नव्हता. मात्र लोकांसोबत मतदारांसोबत ज्यांनी ते सरकार बनवले त्यांनी गद्दारी केली. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम केले. ज्यांनी कारसेवकांवर गोळ्या चालवल्या त्या समाजवादी सोबतही यांनी आघाडी केली," अशी टीकाही शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठकरेंवर केली.

हणूमान चालिसा म्हणण्यावरही महाराष्ट्रात बंदी होती -श्रीकांत शिंदे म्हणाले, "हणूमान चालिसा म्हणण्यावरही महाराष्ट्रात बंदी होती. मला संपूर्ण हणूमान चालिसा येते, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी थेट लोकसभेतच हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली. तसेच, आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर आणि हिंदूत्वार चालणारे लोक आहोत. ज्यांना हनुमान चालिसा म्हणायची होती त्यांना कारागृहात टाकण्यात आले आणि त्यांच्यावर देश द्रोहाचा आरोप लावण्यात आला होता, असेही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले."

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनShrikant Shindeश्रीकांत शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना