शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

खासदार ओवेसींनी भारत-पाकिस्तान T20 विश्वचषक सामन्यावर प्रश्न उपस्थित केले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 14:21 IST

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्याबाबत बीसीसीआयला टोला लगावला आहे.

नवी दिल्ली : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्याबाबत बीसीसीआयला टोला लगावला आहे. "भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने का खेळत आहे? त्यांना तिथेही खेळायचेही नव्हते. भारतापेक्षा पाकिस्तानसोबतचा क्रिकेट सामना महत्त्वाचा आहे का? आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही, पण त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियात खेळणार आहे. व्वा काय प्रेम आहे, असा टोला ओवेसी यांनी लगावला. 

 "तुम्ही जर पाकिस्तान विरुद्ध खेळला नाही तर काय होईल? टेलिव्हिजनचे २००० कोटींचे नुकसान होईल, पण भारतापेक्षा जास्त फरक पडतो का?, असा सवालही त्यांनी केला आहे. 

तो माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला... ! दिनेश कार्तिकचे रोहित शर्मासाठी भावनिक पत्र...

गेल्या काही दिवसापासून भारत पाकिस्तान सामन्यावरुन चर्चा सुरू आहेत. भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नसल्यामुळे आशिया चषक तटस्थ ठिकाणी खेळवला जाईल असे बीसीसीआयच्या सचिवांनी म्हटले होते.यावर आज खासदार ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली. जय शाह आशियाई क्रिकेट परिषदचे प्रमुख आहेत. 

टी-२० विश्वचषकाचा सामना कोण जिंकणार, भारत की पाकिस्तान?, असा प्रश्न ओवेसी यांनी पत्रकारांनी केला. यावर ओवेसी यांनी, 'मला माहित नाही की सामना कोण जिंकेल, पण भारत जिंकावा आणि शमी आणि सिराजसारखी आमची मुलं पाकिस्तानला चिरडून टाकावीत अशी माझी इच्छा आहे, असंही ओवेसी म्हणाले. यावेळी ओवेसी यांनी मुस्लिम खेळाडूंच्या ट्रोलिंगचा मुद्दाही उपस्थित केला.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीCrime Newsगुन्हेगारीJay Shahजय शाहTeam Indiaभारतीय क्रिकेट संघPakistanपाकिस्तान