शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

'वय झालं की मरावच लागतं'! कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंवर MPच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 19:52 IST

जबलपूर येथील चौहानी स्मशानभूमीवर बुधवारी तब्बल 41 मृतांवर अंतिमसंस्कार करण्यात आला. मात्र, शहरात केवळ पाचच मृत्यू झाल्याचा दावा राज्य सरकारच्या आरोग्य बुलेटिनने केला आहे.

ठळक मुद्देकोरोनाने मध्य प्रदेशातही थैमान घातले आहे. येथील कोरोना स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे.कोरोना मृत्यूंवर शिवराज सरकारमधील मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.जबलपूर येथील चौहानी स्मशानभूमीवर बुधवारी तब्बल 41 मृतांवर अंतिमसंस्कार करण्यात आला.

भोपाळ - कोरोनाने मध्य प्रदेशातही थैमान घातले आहे. येथील कोरोना स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. एकीकडे रोजच्या रोज हजारो करोनाबाधित समोर येत असतानाच दुसरीकडे शेकडोच्या संख्येने मृत्यूही होत आहेत. मात्र, या मृत्यूंवर शिवराज सरकारमधील मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लोकांचे वय झाले, की मरावेच लागते, असे पशुपालन मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी म्हटले आहे.  (MP Minister Prem Singh Patel controversial comment on corona deaths)

CoronaVirus : बेजबाबदारपणाचा कळस! आधी दिली Covaxin, तर दुसऱ्यांदा दिला Covishieldचा डोस; मग...

प्रेम सिंह यांना मध्य प्रदेशात कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंच्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, की मृत्यू झाले आहेत, ते कुणीही थांबू शकत नाही. डॉक्‍टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांनी डॉक्टरांकडे जायला हवे. मृत्यूंच्याच बाबतीत सांगायचे, तर लोकांना आपले वय पूर्ण झाले, की मरावेच लागते.

जबलपूर येथील चौहानी स्मशानभूमीवर 41 मृतांवर अंत्यसंस्कार -मध्येप्रदेशातील रुग्णालयांतून भयावह दृष्य समोर येत असतानाच प्रेम सिंह यांचे हे वक्तव्य आले आहे. एवढेच नाही, तर शिवराज सरकार कोरोनामुळे होत असलेल्या मृतांचे आकडे लपवत असल्याचा आरोपह विरोधक करत आहेत. जबलपूर येथील चौहानी स्मशानभूमीवर बुधवारी तब्बल 41 मृतांवर अंतिमसंस्कार करण्यात आला. मात्र, शहरात केवळ पाचच मृत्यू झाल्याचा दावा राज्य सरकारच्या आरोग्य बुलेटिनने केला आहे.

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

भोपाळ आणि इंदूर येथील स्मशानभूमीतही, अशीच स्थिती बघायला मिळाली. येथे लोकांना आपल्या नातलगाच्या अंत्यसंस्कारासाठी अक्षरशः वाट बघावी लागली.

24 तासांत 9 हजार हून अधिक लोकांना कोरोनाची लागण - मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत 9 हजार हून अधिक कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर कोरोनामुळे 51 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. राज्यात आतापर्यंत 3 लाख 63 हजारहून अधिक लोकांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश पाठोपाठ आता गुजरातमध्ये कोरोनाचा कहर -महाराष्ट्र, दिल्ली पाठोपाठ आता गुजरातमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक स्मशानांबाहेर मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधींसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अहमदाबाद, सूरत सारख्या प्रमुख शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. हिंदू धर्मात साधारणपणे सूर्योदयानंतर अंत्यविधी करत नाहीत. मात्र कोरोना मृतांचा आकडा वाढतच असल्यानं अनेक ठिकाणी रात्रीदेखील अंत्यस्कार सुरू आहेत. 

एकाचवेळी 25 जणांना अग्नी -सूरत शहरातल्या उमरा भागात एका स्मशानात दोन दिवसांपूर्वी एकाचवेळी 25 जणांना अग्नी देण्यात आला. रात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बडोद्यातही रात्रीच्या वेळी मृतदेहांवर अंत्यविधी होत आहेत. गुजरातच्या प्रमुख शहरांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि मृतांच्या नातेवाईकांना फार वेळ प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी अधिकाऱ्यांनी लोखंडाच्या चिता तयार केल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यू