शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Kapil Sibal: “धर्माचा वापर शस्त्र म्हणून करण्याचे भारत उत्तम उदाहरण”: कपिल सिब्बल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 15:29 IST

Kapil Sibal: विरोधी पक्षातील नेते सतत सीबीआय, ईडी आणि पोलिसांच्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत, असे सांगत कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारवर टीका केली.

Kapil Sibal: आताच्या घडीला राज्यासह देशपातळीवर विविध मुद्द्यांवरून सातत्याने विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. यातही केंद्रीय तपास यंत्रणांचे नेते, लोकप्रतिनिधींवर पडणारे छापे यांवरूनही विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली जात आहे. यातच काँग्रेसचे माजी नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ खासदार कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. सध्या जगभरात मोठ्या प्रमाणावर धर्माचा वापर शस्त्र म्हणून करण्यात येत आहे. भारत हे एक याचे उत्तम उदाहरण आहे. अशी घणाघाती टीका कपिल सिब्बल यांनी केली आहे. 

कपिल सिब्बल यांनी न्यायव्यवस्थेवरही टीका केली. गरीब माणसाकडे वकिलाला द्यायला पैसे नसतील, तर तो न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात येऊ शकत नाही, असा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे. दुसरीकडे, देशातील बहुसंख्य जनता घाबरलेली आहे. ते मानसिकदृष्ट्या खचले आहेत. समाजात पसरत असलेल्या द्वेषाबाबत काय करायचे? यावरचे उत्तरही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे हे लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत, असा कपिल सिब्बल म्हणाले. 

विरोधीपक्षातील नेते भीतीच्या सावटाखाली जगत आहेत 

भारतात सध्या ज्या पद्धतीने द्वेषाचे राजकारण केले जात आहे, ते एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडून केले जात आहे. संबंधित लोकांवर पोलिसांकडूनही काहीही केली जात नाही. जे द्वेषपूर्ण भाषणे देतात त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने अशा लोकांना पुन्हा द्वेषपूर्ण भाषणे करायला प्रोत्साहन मिळत आहे, असे सांगत आम्हीही सतत भीतीमध्ये जगतो. आम्हाला ईडीची भीती वाटते, आम्हाला सीबीआयची भीती वाटते, आम्हाला सरकारची भीती वाटते, आम्हाला पोलिसांची भीती वाटते, आम्हाला प्रत्येकाची भीती वाटते. आमचा आता कोणावरही भरवसा राहिलेला नाही, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलCentral Governmentकेंद्र सरकार